Manikrao Kokate's Controversial Statement on Onion Prices
महाराष्ट्र मुंबई शेती

कांद्याचे दर पडायला शेतकरीच जबाबदार, कृषीमंत्र्यांचं शेतकऱ्यांच्या वेदनांवर मीठ चोळणारं वक्तव्य

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. कांद्याचे बाजारभाव पडण्याबाबत भाष्य करताना त्यांनी शेतकऱ्यांनाच यासाठी जबाबदार धरले आहे, ज्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, “एखाद्या शेतकऱ्याला कांद्याच्या बाजारभावाचा फायदा झाला म्हणून, बाकी सगळे कांदा लावत सुटतात, कांद्याची लागवड किती करावी यालाही मर्यादा आहे, दुप्पट तिप्पट ठीक पण पन्नास पटीने कांद्याची लागवड करायला लागले, तर कांद्याचे बाजारभाव पडणारच.”

त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेक शेतकरी संघटना आणि विरोधी पक्ष आक्रमक होण्याची चिन्हं आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणींसाठी त्यांनाच जबाबदार धरून अशी वक्तव्ये करणे अयोग्य असल्याचा आरोप कोकाटेंवर होत आहे. तर सध्या कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी आधीच अडचणीत असून, त्यातच अशा प्रकारची विधानं त्यांच्या वेदनांवर मीठ चोळणारी आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत