government take care children who lost their parents
कोल्हापूर महाराष्ट्र

कोरोनाकाळात आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या बालकांसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

कोल्हापूरः कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने एक अतिशय कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. ज्या मुलांच्या पालकांचे कोरोनामुळे निधन झाले आहे, अशा मुलांचे पालकत्व कोल्हापूर जिल्हा प्रशासन स्वीकारणार करणार असल्याची माहिती जिल्हयाचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. या मुलांची माहिती संकलित करण्याचं काम सुरु असून त्यानंतर काही मुलांना दत्तक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले कि, “कोरोना संसर्गामुळे अनेक कुटूंबातील कर्त्या व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामध्ये महिलांचाही समावेश आहे. आज जवळपास जिल्ह्यातील ४५ मुलांच्या आई वडिलांपैकी एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. अशा मुलांच्या सामाजिक आणि शैक्षणिक भविष्याचे नुकसान होवू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांची माहिती संकलनाचे काम सुरू आहे. जिल्ह्यात ४५ मुलांचे आई किंवा वडील नसल्याचे समोर आले आहे. तसेच दोन मुलांचे आई-वडील असे दोन्ही हिरावून घेतल्याचे समोर आले आहे. अशा मुलांची पालनपोषणाची जबाबदारी आता कोल्हापूर जिल्हा प्रशासन घेणार आहे. वेळ पडल्यास त्यांना जिल्हा प्रशासन दत्तक ही घेणार असल्याची तयारी केली जात आहे. त्यांच्या भवितव्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत