विधीमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात सध्या मुंबईत सुरु आहे. या अधिवेशनात आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांकडून देखील अशाच प्रकारे पोलिसांचा अपमान झाल्याचं फडणवीस यांनी सभागृहात म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, ‘कंगना राणावत हिने मुंबई पोलिसांबाबत जे वक्तव्य केलं आहे त्याचा निषेधच आहे. तिचं वक्तव्य हे निषेधार्हच आहे. कारण गेली पाच वर्षी मी गृहमंत्री देखील होतो. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांची नेमकी काय क्षमता आहे हे मला ठाऊक आहे. त्यामुळे नक्कीच कंगना राणावतच्या वक्तव्याने पोलिसांचा अपमान झाला आहे.’ असं फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले.
पण ते असंही म्हणाले की, ‘राजकीय इच्छाशक्तीमुळे अनेकदा पोलिसांवर मर्यादा येतात. आपल्याकडे नेहमीच पोलिसांच्या अकार्यक्षमतेबाबत बोललं जातं. एवढंच काय आपले आदरणीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब हे कल्याणच्या सभेत याच पोलिसांच्या संदर्भात म्हणाले होते की, हे पोलीस भांडी धुण्याच्या लायकीचे आहेत. तेव्हा पोलिसांचा अपमान झाला नव्हता का? त्यामुळे आता भूमिका बदलल्या की व्यक्ती कशी बदलते हे आपण पाहतो आहेतच.’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
आजही मुंबई पोलिसांचा आम्ही सन्मान करतो.
पण पोलिस भांडी धुण्याच्या कामाचे हे मुख्यमंत्री का बोलले?
आज माध्यमांच्या उल्लेखाबाबत बोलले जाते. पण ‘सामना‘ बाबत तीच भूमिका घ्याल का?
पंतप्रधानाचा उल्लेख तेथे कसा केला जातो, हे सांगावे लागेल का: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) September 8, 2020
देवेंद्र फडणवीस असंही म्हणाले की, आज माध्यमांच्या उल्लेखाबाबत बोलले जाते. पण ‘सामना’बाबत तीच भूमिका घ्याल का? पंतप्रधानाचा तिथे कसा उल्लेख केला जातो, हे सांगावे लागेल का?




