उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यात एका 37 वर्षीय व्यक्तीने पत्नीची गोळ्या घालून हत्या केली. मागील 15 दिवसांपासून पत्नी शारीरिक संबंध ठेवत नसल्यामुळे संतप्त झालेल्या पतीने तिच्यावर गोळी झाडली. याशिवाय आरोपीने आपल्या तीन मुलांनाही कालव्यात फेकले.
पोलिस चौकशीत आरोपीने सांगितले कि, “पत्नी पंधरा दिवसांपासून संबंध ठेवत नव्हती. रात्री निर्णय घेतला की जर तिने सकाळी ऐकले नाही तर तिला ठार मारेल. सकाळी पुन्हा तसाच प्रकार घडला, पत्नीने जवळ येण्यास नकार दिल्यामुळे तिच्यावर गोळ्या झाडून तिची हत्या केली.” पत्नीची हत्या केल्यानंतर तो मुलांना घेऊन कालव्याजवळ पोहोचला. त्याला वाटले की पत्नीनंतर या मुलांना कोण सांभाळेन? असा विचार करून त्याने सानिया, वंश आणि हर्षिता या तीन मुलांना कालव्यात फेकून दिले. हर्षिताचे वय केवळ 15 महिने आहे.
स्थानिक लोकांनी पोलिसांना घटनेविषयी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी पप्पूला अटक केली. कालव्यात फेकलेल्या मुलांचा शोध सुरू आहे, मात्र अद्याप मुलांविषयी कोणतीही माहिती मिळाली नाही. पप्पूला तुरूंगात पाठविण्यात आले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
भयंकर! ‘मला मुलगी हवी होती’ असे म्हणत बापानेच केली एक वर्षाच्या मुलाची हत्या