कोरोना मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त लिलावती रुग्णालयात दाखल

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याना अस्वस्थता आणि श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्याना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर नॉन कोविड कक्षामध्ये उपचार सुरू आहेत. संजय दत्तला करोना सदृश्य लक्षणं जाणवल्यानं तातडीनं रॅपिड अॅण्टीजेन चाचणी करण्यात आली. या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यानंतर आरटी-पीसीआर चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आला असून, या चाचणी रिपोर्ट अजून आलेला […]

महाराष्ट्र मुंबई

रेणुका शहाणे यांची अमृता फडणवीस यांच्यावर खरमरीत टीका

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सध्या चांगलंच चर्चिलं जात आहे. या प्रकारात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबईविषयी एक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली असून अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी चक्क खडेबोल सुनावले आहेत. “सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास ज्या प्रकारे सुरू आहे, त्यावरून मला […]

मुंबई

मुंबईला पावसाने झोडपलं, वाहतूक ठप्प, कांदिवलीत दरड कोसळली

मुंबई आणि उपनगराला पावसाने झोडपलं आहे. ठिकठिकाणी पाणी साचलं असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि उपनगरांमधील सर्व शासकीय कार्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, मदत व पुनर्वसन विभागाने ही माहिती दिली आहे. आज आणि उद्या मुंबई आणि उपनगरात हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, […]

महाराष्ट्र मुंबई

मुंबई राहण्यासाठी सुरक्षित नसल्याची भावना : अमृता फडणवीस

अमृता फडणवीस यांनी ट्विट केले आहे की, ज्या प्रकारे सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण हाताळलं जात आहे, ते पाहून मला वाटतंय की मुंबईने माणुसकी गमावली आहे आणि निरपराध, स्वाभिमानी लोकांना राहण्यासाठी हे शहर सुरक्षित नाही. The manner in which #SushantSinghRajputDeathCase is being handled – I feel #Mumbai has lost humanity & is no more safe […]

महाराष्ट्र मुंबई

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचं निधन

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा जोशी यांचं निधन झालं आहे. अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालंय. त्या 75 वर्षांच्या होत्या. मुंबईतल्या शिवाजी पार्क येथील घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी (आज) पहाटे तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनघा यांच्या पश्चात पती मनोहर जोशी, पुत्र उन्मेष जोशी, अस्मिता आणि नम्रता या दोन कन्या, असा […]

मुंबई

मुंबईत उद्यापासून २०% पाणीकपात

मुंबईत शनिवारपासून (१ ऑगस्ट) २० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय मुंबई पालिका आयुक्तांनी घेतला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या क्षेत्रांमध्ये कमी पाऊस झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात आज चार लाख ९९ हजार १९९ दशलक्ष लिटर पाणी आहे. हे जलाशयांच्या पूर्ण क्षमतेच्या ३४% इतके  आहे. गेल्या वर्षी याच वेळी तलावात १२ लाख […]