मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २० ते २४ एप्रिल या कालावधीत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या वतीने […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराची रक्कम शिक्षणासाठी अर्पण; डॉ. गिते यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ प्राप्त डॉ. सोमनाथ वेणूताई निवृत्ती गिते यांनी पुरस्काराची संपूर्ण रक्कम तसेच स्वतःची भर घालून एकूण रुपये ३२,००० शैक्षणिक संस्थांना देणगी म्हणून देण्याचा प्रेरणादायी निर्णय घेतला आहे. या पुरस्काराची मूळ रक्कम रुपये १५,००० इतकी […]
बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील एका गावात 50 वर्षीय नराधमाने 10 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही पाचवी इयत्तेत शिकत असून गावातीलच एका किराणा दुकानदाराने […]
अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह महाराष्ट्रातही ढगाळ वातावरणासोबत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि विजा कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील हवामानातही गेल्या […]
नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. रंभाबाई आनंदा काळे (वय ६०) असे मृत महिलेचे नाव असून त्या निफाड येथील एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. रंभाबाई काळे या निफाडमधील मामलेदार चौक परिसरात वास्तव्यास होत्या. त्या अचानक बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा भाचा […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा पसरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून नागपूरमधील खामला येथील मेघे निवासस्थानी जाऊन दत्ताभाऊ मेघे यांचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राज्यमंत्री अॅड आशिष जयस्वाल, आमदार चरणसिंह […]
पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीने स्वतःची ओळख इस्रोतील शास्त्रज्ञ म्हणून करून दिली होती. पीडित महिला हिंजवडी येथील एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत आहे. आरोपीची ओळख जयेश पाटील उर्फ आदर्श म्हात्रे अशी असून तो अलिबाग येथील रहिवासी असल्याचे […]
विलेपार्ले हादरले! बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची निर्घृण हत्या
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा नवरा आकाश मौर्य याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडली. बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या सागरवर चाकूने वार करण्यात आले. गंभीर जखमी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री मुंबईतील विलेपार्ले परिसरात ही घटना […]
जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांची नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार आहे. पुढील पाच वर्षांत केवळ जाहिरातींच्या माध्यमातून एसटी महामंडळाला तब्बल २५० कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. एसटी महामंडळाच्या मुख्यालयात पार पडलेल्या ३१० व्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. […]
आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारसोबत समन्वय
मुंबई : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. विविध देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या संपर्कात राज्य शासन असून त्यांच्या मदतीसाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच केंद्र सरकारसोबतही समन्वय ठेवून आवश्यक ती मदत व सहकार्य मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री […]










