महाराष्ट्रात एका आठवड्यापासून कोरोनाचे नवीन रुग्ण आढळण्याच्या गतीमध्ये 200% वाढ झाली आहे. याच कारणामुळे 7 दिवसांपासून कोरोना सक्रिय प्रकरणांची संख्या सातत्याने वाढत आहे. या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे की महाराष्ट्र राज्य कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या उंबरठ्यावर उभे आहे. जर ही परिस्थिती वेळेत नियंत्रणात आणली नाही, तर परिस्थिती आणखी बिघडू शकते.
गुरुवारी राज्यात विक्रमी 5,427 नवीन रुग्ण आढळले. 4 डिसेंबरनंतर पहिल्यांदाच राज्यात एका दिवसात 5 हजाराहून अधिक नवीन रूग्ण भेटले आहेत. राज्यात आतापर्यंत 20 लाख 81 हजार 520 लोकांना लागण झाली आहे. यापैकी 19 लाख 87 हजार 804 लोक बरे झाले आहेत, तर 51 हजार 669 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तेथे 40 हजार 858 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्नांची संख्या लक्षात घेता, अमरावतीत दर शनिवारी रात्री 8 पासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. अकोल्यात दर रविवारी लॉकडाऊन असेल. त्याचबरोबर यवतमाळमध्येही निर्बंध वाढविण्यात आले आहेत. येथे 28 फेब्रुवारीपर्यंत सर्व शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच रेस्टॉरंट, फंक्शन हॉलमध्ये केवळ 50% लोक येऊ शकतील. 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्रित येण्यास प्रतिबंध असेल.




