मुंबई : भांडुप (पश्चिम) रेल्वे स्थानकाबाहेर सोमवारी रात्री उशिरा घडलेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून किमान १० जण जखमी झाले आहेत. २९ डिसेंबर रोजी रात्री सुमारे १०.०५ वाजता ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे मुंबईतील गर्दीच्या उपनगरीय स्थानक परिसरातील रस्ते सुरक्षा आणि पादचाऱ्यांसाठी अपुऱ्या जागेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हा अपघात मार्ग A-606 […]
टॅग: सार्वजनिक सुरक्षा
पुणे : बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
पुणे : जुन्नर-शिरूर तालुक्याच्या सीमेवरील पारगाव तर्फे आळे परिसरात एका आठ वर्षांच्या मुलावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला झाला, ज्यामुळे ग्रामीण पुण्यातील एक शांत दुपार भयावह परिस्थितीत रूपांतरित झाली. या घटनेने बिबट्यांचा मुक्त संचार असलेल्या भागात राहणाऱ्या कुटुंबांमधील वाढत्या धोक्याची पुन्हा एकदा जाणीव करून दिली. पीडित रोहित काफरे हा शेतमजूर कुटुंबातील मुलगा आहे. घटनेच्या वेळेस त्याचे पालक […]
ही क्रूरता! भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राहुल गांधींची टीका
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी भटक्या कुत्र्यांबाबत कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने दिल्ली-एनसीआरमधील सर्व भटक्या कुत्र्यांना तात्काळ पकडून त्यांचे निर्जंतुकीकरण करण्यास, त्यांना लसीकरण करून कायमस्वरूपी आश्रयस्थानात ठेवण्याचे निर्देश दिले. या निर्णयावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, “दिल्ली-एनसीआरमधून सर्व भटक्या कुत्र्यांना […]
पुण्यासाठी आणखी ५ नवीन पोलीस स्टेशनला मान्यता देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे : पोलिसांसमोराची आव्हाने, कायदा व सुव्यवस्थेचे नवे प्रश्न लक्षात घेऊन ६० वर्षानंतर पोलीस दलाचा नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. पोलीस स्टेशनची नवी रचना, नार्कोटीक्स, फॉरोन्सिक युनिट तयार करण्यात आले आहे. यापुढेही पोलस दल आधुनिक करण्यासाठी शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल. तसेच पुणे शहरासाठी लोहगाव, लक्ष्मीनगर, नऱ्हे, मांजरी, येवलेवाडी अशा पाच पोलीस स्टेशनची मागणी […]
संगमनेरातील कत्तलखाने व अवैध धंद्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष – आमदार खताळ यांचा सभागृहात आरोप
अहिल्यानगर : संगमनेर शहरातील अवैध कत्तलखाने व इतर गुन्हेगारी कारवायांबाबत स्थानिक पोलिस अधिकारी शासनाला खोटी माहिती देत असल्याचा गंभीर आरोप आमदार अमोल खताळ यांनी राज्य विधिमंडळात केला आहे. विधिमंडळात लक्षवेधी सूचनेद्वारे बोलताना आमदार खताळ यांनी सांगितले की, संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी व शहर पोलीस निरीक्षक यांनी गोवंश हत्याबंदी कायद्यातील कारवाई बाबत चुकीची व दिशाभूल करणारी […]
पुणे : पंचवटी परिसरात झाड कोसळले; वाहने अडकली, एक विद्यार्थिनी जखमी
पुणे : पुणे शहरात सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पाषाणमधील पंचवटी परिसरातही परिणाम दिसून आला. गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास या भागात झाड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पंचवटी परिसरातील निशिगंध इमारतीजवळ घडली. जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे रस्त्यालगत असलेले एक जुने […]
आवश्यकतेनुसार धोकादायक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवा, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे निर्देश
मुंबई : पावसाळ्यामध्ये पर्यटक ज्या ठिकाणी अधिक संख्येने येतात तेथे पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात यावी. जी पर्यटनस्थळे धोकादायक असतील तेथे मागदर्शक सूचना लावण्याबरोबरच सुरक्षा बंदोबस्त ठेवून दुरुस्ती होईपर्यंत ती पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवण्यात यावीत. त्याचबरोबर प्रशासन अथवा पोलीस यंत्रणेच्या सूचनेनंतर देखील दक्षता न घेणाऱ्या पर्यटकांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, असे निर्देश मुख्य सचिव सुजाता […]
मान्सून काळात आपत्ती उद्भवल्यास निवारणासाठी महाराष्ट्र सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : मान्सूनच्या काळात एखादी आपत्ती निर्माण झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. त्यादृष्टीने सर्वच यंत्रणांनी योग्य तयारी केली आहे. यंदाच्या मान्सूनच्या काळात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान रोखण्यासाठी काम करावे. आपत्तीच्या काळात सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी जबाबदारी म्हणून मुख्यालयाच्या संपर्कात राहून 24 तास शनिवार व रविवारीही दक्ष राहून काम करावे. आपत्तीच्या काळात तातडीने प्रतिसाद […]
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षित, सज्ज रहावे – नागरिक संरक्षण संचालनालयाचे आवाहन
मुंबई : कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षित, सज्ज आणि जागरूक रहावे, असे आवाहन नागरिक संरक्षण संचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी अधिकृत सरकारी चॅनेल्स (टीव्ही, रेडिओ, खात्रीशीर सोशल मीडिया, स्थानिक प्रशासन) यांच्याकडूनच माहिती घेऊन सतर्क रहावे. परिस्थिती अशांत होईल अशा अफवा किंवा अनधिकृत माहिती पसरवू नये. आपत्कालीन परिस्थितीत टॉर्च, बॅटऱ्या, मेणबत्त्या, प्राथमिक उपचार किट […]
देशभरात ७ मे रोजी मॉक ड्रिल, का आवश्यक आहे मॉक ड्रिल? जाणून घ्या संपूर्ण माहिती…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. परिस्थिती युद्धजन्य होत असल्याने केंद्र सरकारने नागरिकांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना ७ मे २०२५ रोजी ‘सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल’ घेण्याचे आदेश दिले आहेत. मॉक ड्रिल म्हणजे काय? […]










