शेतकऱ्यांच्या हट्टापुढे अखेर मोदी सरकारला नमते घ्यावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधानांनी आज सकाळी देशाला संबोधित करताना ही मोठी घोषणा केली. सरकारने हा कायदा चांगल्या हेतूने आणला, मात्र काही शेतकऱ्यांना समजवण्यात आम्ही अपयशी ठरलो, असे ते यावेळी म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही अत्यंत नम्रतेने […]
टॅग: शेतकरी
विमा कंपन्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत आलेल्या तक्रारी तातडीने निकाली काढाव्यात – कृषिमंत्री दादाजी भुसे
मुंबई : विमा कंपन्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्राप्त तक्रारी तातडीने निकाली काढाव्यात, असे निर्देश कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सहभागी विमा कंपन्यांकडून स्थानिक नैसर्गिक आपत्ती व पीक काढणी नंतर आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत मंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक आयोजित करण्यात […]
पीएम किसान सम्मान निधी योजनेचा लाभ कोण घेऊ शकणार नाही? जाणून घ्या…
नवी दिल्ली : 24 फेब्रुवारी 2019 रोजी पीएम किसान सम्मान निधी योजना सुरू करण्यात आली, तेव्हा त्याचा लाभ केवळ 2 हेक्टरपर्यंतच्या छोट्या आणि सीमित शेतकऱ्यांपर्यंत मर्यादित होता. या योजनेत नंतर 1 जून 2019 ला सुधारणा करण्यात आली आणि सर्व शेतकरी कुटुंबांपर्यंत त्यांच्या होल्डिंगच्या आकाराकडे दुर्लक्ष करून विस्तारित करण्यात आले. योजने अंतर्गत लाभ प्रति कुटुंब 6000 […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता ‘ते’ 7 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना द्यावे – माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसींच्या खरेदीसाठी 7 हजार कोटी रुपयांचा चेक लिहून ठेवला होता. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना मोफत लसी पुरवण्याची घोषणा केली. लसीकरणाचा संपूर्ण भार केंद्र सरकार उचलणार असून १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस मिळणार आहे. या निर्णयामुळे राज्यांवर असणारा भार कमी झाला आहे. त्यामुळे आता ते 7 हजार […]
खुशखबर : शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत बिनव्याजी पीककर्ज उपलब्ध होणार
मुंबई : राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना मोठाच दिलासा दिला आहे. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आता शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत तीन लाखांपर्यंत बिनव्याजी पीककर्ज उपलब्ध होणार आहे. त्याच प्रमाणे ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही, अशा शेतकऱ्यांनाही तातडीने लाभ मिळू शकणार आहे. मंत्री बाळासाहेब पाटील, कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सहकार विभाग, तसेच कृषी विभागाच्या विविध […]
ब्रेकिंग : गाझीपूर आणि सिंघू सीमेवर मोठी पोलीस फौज तैनात, अधिकाऱ्यांना आंदोलन संपवण्याच्या सूचना
गाझीपूर आणि सिंघू सीमेवर गुरुवारी दुपारी दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या पोलिसांना मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहे. गाझीपुर येथे वीज व पाणीपुरवठा खंडित केला आहे. पोलिसांनी आज शेतकर्यांना रस्ता मोकळा करण्यास सांगितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रात्री उशिरापर्यंत दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील पोलिस आंदोलनकर्त्यांना हटवण्यासाठी संयुक्त कारवाई करू शकतात. यूपीच्या योगी सरकारने डीएम आणि […]
शेतकऱ्यांना 26 जानेवारीला ट्रॅक्टर रॅली काढण्यास परवानगी, ‘या’ अटी कराव्या लागतील मान्य
26 जानेवारीला दिल्लीत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर रॅली काढण्यास दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली आहे. ‘ट्रॅक्टर रॅली टिकरी, सिंघू आणि गाझीपूर सीमेवरून दिल्लीत दाखल होईल. या रॅलीला टिकरीपासून 63 कि.मी., सिंघूपासून 6२ किमी आणि गाझियाबाद सीमेपासून 46 किमी अंतरावर जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. मोर्चाच्या वेळी शेतकऱ्यांना या अटी मान्य कराव्या लागतील : विशेष पोलिस आयुक्त म्हणाले की […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कृषी कायद्यांविषयी केली विस्तृत चर्चा, जाणून घ्या सर्व मुद्दे
नव्या कृषी कायद्यांची माहिती देण्यासाठी मध्य प्रदेशातील रायसेन येथे शेतकरी महासंमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी कृषी कायद्यांविषयी निर्माण करण्यात आलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय कृषी कायदे हे एका रात्रीत आलेले कायदे नाहीत, तर गेल्या २० ते २२ वर्षांमध्ये आलेल्या प्रत्येक सरकारने त्यावर व्यापक चर्चा केलेली आहे, तसेच यावर राज्यांशी, […]
विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं, ‘या’ मुद्द्यांवर घेतली आक्रमक भूमिका
मुंबई : विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली. ठाकरे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या हाती काहीच आलं नाही. पूरग्रस्तांना फक्त तीन हजार रुपयांचा धनादेश देणाऱ्या या सरकारची अवस्था राजा उदार झाला अन् हाती भोपळा आला, अशी झाली आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. सभागृहात देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत अनेक […]
‘या’ कारणामुळे शरद पवार कृषी कायद्यांच्या विरोधात बोलत नाहीत
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे कि, शरद पवार जेव्हा देशाचे कृषीमंत्री होते तेव्हा त्यांनीच शेती क्षेत्रात खासगी कंपन्यांचा प्रवेश आवश्यक आहे, असे सांगितले होते. त्यांनीच २०१२ ते १७ साली तयार करण्यात आलेल्या बाराव्या पंचवार्षिक योजनेत हा मुद्दा मांडला होता. तसेच एपीएमसी कायद्यात बदल करण्यासाठी पवारांनी अनेक राज्यांना पत्र देखील पाठवली […]










