मुंबई : राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्र आणि किनारपट्टी परिसरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे 30 नोव्हेंबरपासून पुढील तीन दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना इशारा जारी केला आहे. हवामान खात्याकडून मुंबईसह, ठाणे, पालघर, नाशिक, […]
टॅग: rain
राज्यात पुढील चार ते पाच दिवस जोरदार गडगडाटासह पाऊस
मुंबई : राज्यात पुढील चार ते पाच दिवसांत जोरदार गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यात काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसू शकतो. त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये सातारा, पुणे आणि अहमदनगर या […]
राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेज अलर्ट जारी
मुंबई : राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढत जाणार आहे. आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेज अलर्ट जारी करण्यात आला असून तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई शहर आणि उपनगरात रिमझिम पाऊस सुरु आहे. तसेच, राज्यात अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी […]
मुंबईत पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाणी साचलं, वाहतूक विस्कळीत
मुंबई : मुंबईत आज मान्सून दाखल झाला असून पहिल्याच पावसात मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. दादर, कुर्ला, सायन, मुलुंड, माटुंगा, हिंदमाता, अंधेरी, घाटकोपर, गोरेगाव, मालाड, जोगेश्वरी, कांदिवली, बोरिवली, गोवंडी या भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईतील दादर, हिंदमाता, सायन, माटुंगा, अंधेरी सबवे, किंग्ज सर्कल तसेच कुर्ला परिसर येथे पाणी साचले आहे. दोन ते तीन […]
मोठी बातमी: राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ दुकानांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश
मुंबई: राज्यातील व्यापारी समाज लॉकडाऊन उठवण्याची मागणी करत असताना ठाकरे सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बांधकाम साहित्याशी संबंधित दुकानांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे. पावसाळा तोंडावर असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते. तौत्के चक्रीवादळामुळे कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये घरांची पडझड आणि नुकसान झाले आहे. त्यामुळे कोणतीही नैसर्गिक आपत्ती किंवा संकटात […]
ठाकरे सरकारकडून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर
मुंबई : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पिक वाहून गेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या आर्थिक मदतेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, हे १०,००० कोटी रुपये विविध कारणआंसाठी असणार आहेत. […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आज मराठवाडा दौरा; मदत जाहीर करणार का? याकडे शेतकऱ्यांचं लक्ष
उस्मानाबाद : बुधवार, २१ ऑक्टोबर रोजी म्हणजे आज उद्धव ठाकरे उस्मानाबाद जिल्ह्य़ाचा दौरा करणार आहेत. उस्मानाबादमधील परिस्थितीची पाहणी करण्याबरोबरच शेतकरी, ग्रामस्थांशी संवाद साधतील. पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. परिणामी हजारो हेक्टर पिकांचं नुकसान झालं. जीवितहानी झाली असून जनावरंही दगावली आहे. जवळपास 10 हजार लोकसंख्या असलेल्या काटगावात मोठ्या प्रमाणात ऊस आणि सोयाबीनची लागवड केली जाते. […]
मुंबईला पावसाने झोडपलं, वाहतूक ठप्प, कांदिवलीत दरड कोसळली
मुंबई आणि उपनगराला पावसाने झोडपलं आहे. ठिकठिकाणी पाणी साचलं असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि उपनगरांमधील सर्व शासकीय कार्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, मदत व पुनर्वसन विभागाने ही माहिती दिली आहे. आज आणि उद्या मुंबई आणि उपनगरात हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, […]






