मुंबई : राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्र आणि किनारपट्टी परिसरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे 30 नोव्हेंबरपासून पुढील तीन दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना इशारा जारी केला आहे.
हवामान खात्याकडून मुंबईसह, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या 16 जिल्ह्यांना मंगळवारी येलो अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्हे जास्त प्रभावित होतील. तर मुंबई, ठाणे, पुणे येथे काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
28 Nov; ??
राज्यात 30 Nov-02 Dec मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. वारे जोरदार असण्याची शक्यता. कोकण, मध्य महाराष्ट्र व संलग्न मराठवाडा प्रभावित. मुंबई ठाणे,पुणे सहीत. ???
काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता.
– IMD @RMC_Mumbai pic.twitter.com/yda7Yv5ifZ— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 28, 2021




