मुंबई : श्रमिकांचे ‘बाबा’ अर्थात कष्टकरी, कामगारांचे नेते, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या निधनाने सामाजिक चळवळींचा आधारवड हरपला आहे, अशी शोकभावना व्यक्त करून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ सामाजिक नेते बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. आढाव यांचे निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळींची भरून काढता येणार नाही अशी मोठी हानी झाली आहे, असेही मुख्यमंत्री […]
टॅग: Maharashtra news
चेंडू आणण्यासाठी टेरेसवर गेलेल्या 13 वर्षीय मुलाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू
कोल्हापूर : खेळताना नकळत झालेला निष्काळजीपणा मुलांसाठी किती घातक ठरू शकतो, याचा प्रत्यय करवीर तालुक्यातील उजळाईवाडी येथे आला. एका सातवीत शिकणाऱ्या 13 वर्षीय मुलाचा क्रिकेटचा चेंडू आणताना उच्चदाब विद्युत वाहिनीच्या संपर्कात येऊन मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (५ डिसेंबर) दुपारी घडली. मृत मुलाचे नाव मोहम्मद अफान असिफ बागवान (वय 13, रा. बालाजी पार्क, उजळाईवाडी) असे […]
14 वर्षीय मुलीच्या गळ्यावर वडिलांनीच फिरवले ब्लेड; धक्कादायक घटनेने उडाली खळबळ
मुंबई : एका व्यक्तीने आपल्या झोपलेल्या 14 वर्षीय मुलीच्या गळ्यावर ब्लेडने वार केला. मुलीने आरडाओरडा केल्यानंतर तिला वाचवण्यासाठी धावून आलेल्या पत्नीवरही त्याने हल्ला केला. या भीषण प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी हनुमंत सोनवळला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही धक्कादायक घटना दहिसरमधील कोकणी पाडा परिसरात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हनुमंत सोनवळ […]
महाराष्ट्र ‘राजभवन; झाले आता ‘लोकभवन’
मुंबई : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनचे नाव आता अधिकृतपणे ‘महाराष्ट्र लोकभवन’ असे करण्यात आले आहे. महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी या संदर्भात राजभवन सचिवालयाला निर्देश दिले आहेत. राजभवन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि लोक कल्याणासाठी समर्पित करण्याच्या उद्देशाने हा निर्णय दिशादर्शक आहे, असे राज्यपालांनी सांगितले. ‘लोकभवन’ म्हणून ओळखले जाणारे राजभवन आता केवळ […]
हिंजवडी आयटी पार्क हादरलं: भरधाव बस फुटपाथवर; बहीण–भावाचा जागीच मृत्यू, अनेक जखमी
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पुन्हा एकदा बेफाम वेगाचा कहर पाहायला मिळाला. गर्दीच्या वेळी कंपनीची बस अचानक फुटपाथवर चढत दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर वाहतूक आणि रस्ते सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. हिंजवडी आयटी पार्कमधील वाढत्या अपघातांच्या मालिकेत सोमवारी आणखी एक भीषण घटना घडली. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पंचरत्न चौकाजवळ कंपनीच्या कर्मचाऱ्यांना नेणारी […]
धक्कादायक! 20 दिवसांच्या बाळाला आईनेच नदीत फेकलं, नोकरी करून स्वयंपूर्ण आयुष्य जगण्यासाठी उचलले क्रूर पाऊल…
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात घडलेल्या एका भीषण आणि हृदयाला चटका लावणाऱ्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. 22 वर्षीय महिलेने आपल्या अवघ्या 20 दिवसांच्या नवजात मुलाला वैनगंगा नदीत फेकून देत त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी आईला अटक केली असून तपासात रोज नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, […]
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ 6 महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या…
मुंबई : राज्यात सध्या नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुका जोरात सुरू असताना, आज महाराष्ट्र मंत्रिमंडळाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये म्हाडा गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्प, कौशल्य विद्यापीठासाठी पदांची निर्मिती आणि विविध कायद्यांमध्ये सुधारणा यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयांचे मुख्य मुद्दे: 1. नगर विकास विभाग राज्यातील सिडकोसह विविध प्राधिकरणांच्या जमिनींचा सुयोग्य वापर सुनिश्चित करणे. संकल्पना आधारित आयकॉनिक […]
नवले ब्रिज अपघात प्रकरण : कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याचे ठोस पुरावे नाहीत, आरटीओचा प्राथमिक अहवाल
पुणे : नवले पुल परिसरात झालेल्या कंटेनर ट्रक अपघाताबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) प्राथमिक निष्कर्ष जाहीर केले आहेत. आरटीओच्या मते, हा अपघात वाहन चालकाने कंटेनरवरील नियंत्रण गमावल्यानंतर झाल्याची शक्यता अधिक असून, ब्रेक फेल झाल्याचे कोणतेही ठोस पुरावे आढळलेले नाहीत. पुणे आरटीओच्या फ्लाइंग स्क्वॉडने गुरुवार आणि शुक्रवारी दोन दिवस तपासणी केली. या तपासात असे आढळले की अपघातानंतर […]
नवले ब्रिज परिसरातील अपघातातील मृतांचा आकडा वाढला, सात जणांचा मृत्यू, 15 ते 20 जण जखमी
पुणे : पुणे-बंगळुरू महामार्गावरील नवले ब्रिज परिसरात गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. दोन कंटेनर आणि एका कारचा झालेला हा अपघात इतका भीषण होता की, सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15 ते 20 जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. ब्रेक […]
नवले पुल परिसरात भीषण अपघात; दोन कंटेनर आणि कार जळून खाक, 5 जणांचा मृत्यू
पुणे : पुणे-बंगळुरू महामार्गावरील नवले पुल परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघाताने हाहाकार माजला आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास दोन कंटेनर आणि एका कारचा जबरदस्त अपघात झाला. या अपघातानंतर दोन्ही कंटेनरना अचानक आग लागली असून त्यांच्या मधोमध एक कार अडकली. या कारमधील प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात सुमारे आठ वाहने सहभागी […]









