NDRF successfully rescues 44 citizens from Ahilyanagar district
अहिल्यानगर महाराष्ट्र

अहिल्यानगर जिल्ह्यातील ४४ नागरिकांची एनडीआरएफ कडून यशस्वी सुटका

अहिल्यानगर : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीचा तातडीने सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) पुणे येथील पथकास कर्जत तालुक्यातील मलठण खताळ वस्ती परिसरात तैनात करण्यात आले होते. या पथकाने आज राबविलेल्या मोहिमेत पुरात अडकलेल्या ४४ नागरिकांची सुरक्षित सुटका केली. कमांडंट संतोष बहादूर सिंह यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने परिसरात पाणी व चिखलमय स्थिती तसेच ऊसशेतीमुळे बोटसह बोटीवरील […]

Maharashtra Approves ₹1,339 Crore Relief for 19 Lakh Farmers Affected by Heavy Rain and Floods
महाराष्ट्र मुंबई

जुलै-ऑगस्ट मधील १९.२२ लाख आपदग्रस्त शेतकऱ्यांसाठी १ हजार ३३९ कोटींच्या मदतीस मान्यता

मुंबई : राज्यात जुलै व ऑगस्ट २०२५ या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या १९ लाख २२ हजार ९०९ शेतकऱ्यांच्या १५ लाख ४५ हजार २५०.०५ हेक्टरवरील शेत पिकाच्या नुकसानीपोटी १ हजार ३३९ कोटी ४९ लाख २५ हजाराच्या मदतीस मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली. याबाबतचा शासन […]

Maharashtra Heavy Rain Flood Rescue Eknath Shinde
महाराष्ट्र मुंबई

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत आणि बचावकार्यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्क रहावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. बीड जिल्ह्यातील आष्टी पाथर्डी तालुक्यातील काही गावांना पुराच्या पाण्याने वेढल्याने अडकलेल्या ४० ग्रामस्थांना एनडीआरएफच्या मदतीने एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. अतिवृष्टी […]

Water release from Khadakwasla dam increased; Citizens urged to be vigilant
पुणे महाराष्ट्र

खडकवासलातून पाण्याचा २४,८२७ क्युसेकने विसर्ग; नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ

पुणे : खडकवासला धरण प्रशासनाने मंगळवारी दुपारी मुठा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ केली आहे. दुपारी ४:०० वाजेपूर्वी १९,३३४ क्युसेक इतका असलेला विसर्ग २४,८२७ क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला असल्याची माहिती धरण अधिकाऱ्यांनी दिली. पाटबंधारे विभागाने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून घाटमाथ्यावर आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात जलसाठा वेगाने वाढत आहे. यामुळे धरणातील जलपातळी नियंत्रित […]

Water release from Khadakwasla dam increased; Citizens urged to be vigilant
पुणे महाराष्ट्र

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

पुणे : खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात होणारा पाण्याचा विसर्ग मंगळवारी दुपारी वाढवण्यात आला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. धरणातून ११,८७८ क्युसेक इतका विसर्ग सुरू होता. मात्र, दुपारी २ वाजेपासून हा विसर्ग वाढवून १५,४४२ क्युसेक इतका करण्यात आला आहे. पावसाळा आणि धरणातील पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्गाची मात्रा पुढे आणखी वाढवली किंवा कमी केली जाऊ […]

महाराष्ट्र मुंबई

राज्यात आज व उद्या अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : मध्य भारतावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून याच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), मुंबई महानगर प्रदेश, आणि मराठवाड्यात (प्रामुख्याने पश्चिम आणि दक्षिण भाग) 18 ते 19 ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यात प्रामुख्याने कोकणातील सर्वच जिल्हे; नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पालघर, ठाणे, उर्वरित मुंबई महानगर; […]

Flood situation in East Vidarbha under control; SDRF, NDRF systems ready – Chief Minister Devendra Fadnavis
महाराष्ट्र मुंबई

पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात; एसडीआरएफ, एनडीआरएफ यंत्रणा सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पूर्व विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) सज्ज आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी यासंदर्भात सभागृहात विषय मांडला होता. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पूरस्थितीमुळे काही प्रवासी एसटी […]

नागपूर महाराष्ट्र

महसूल विभागांतर्गत असलेल्या नाल्यांवरील अतिक्रमणे तत्काळ हटवण्याचे निर्देश

नागपूर : महसूल विभागाच्या अंतर्गत असलेल्या नाल्यांवर अतिक्रमणांचा विळखा वाढल्याने पावसाळ्यात अतिवृष्टी नसतांनाही पूर सदृष्य परिस्थिती निर्माण होते. अनेक भागात यामुळे शेतकऱ्यांना व काही ठिकाणी नागरिकांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला तोंड द्यावे लागते. पूरात भरडल्या जाणाऱ्या लोकांचा रोष हा शासनाला घ्यावा लागतो. वास्तविक ज्या कुणामुळे हे अतिक्रमण महसूल विभागाअंतर्गत असलेल्या नाल्यांवर केले गेले आहे त्यांच्याविरुध्द कठोर […]

uddhav-thakrey
नागपूर महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांकडून नागपूर येथील पूरामुळे नुकसान झालेल्या व्यक्तींना मदत जाहीर

नागपूर जिल्हयात नवेगाव खैरी प्रकल्पातून सरासरी ६८३९ क्युमेक व तोतलाडोह प्रकल्पातून ६६९३ क्युमेक पाण्याचा विसर्ग होत असून एकूण २५ गावांना पुराचा विळखा पडला आहे. त्यामुळे २ हजार ९०७ कुटुंबांतील ११ हजार ६४ व्यक्तींना फटका बसला आहे. अनेक नागरिकांचे शाळा व समाजभवन येथे स्थलांतरण करण्यात आले. या सर्व नागरिकांचे प्रचंड हाल झाले. पूर परिस्थितीमुळे अनेकांचे संसार […]