अहिल्यानगर : मागील काही दिवसांपासून अहिल्यानगर शहरासह परिसरात बिबट्यांचा वावर वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नरभक्षक बिबट्यांकडून वारंवार हल्ले होत असतानाच आता पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बिबट्याने आईच्या डोळ्यादेखत पाच वर्षांच्या मुलीला उचलून नेल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ही घटना अहिल्यानगर तालुक्यातील खारेकर्जुने गावात बुधवारी (१२ नोव्हेंबर) […]
टॅग: Ahmednagar
आता मी कंटाळलो…! व्यथित इंदोरीकर महाराजांचा कीर्तन सोडण्याचा निर्णय
अहिल्यानगर : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी कीर्तन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला. मात्र यावरुन सोशल मीडियातून झालेल्या व्यक्तिगत टीकांमुळे महाराज फारच व्यथित झाले आहेत. परिणामी त्यांनी थेट कीर्तन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इंदोरीकर महाराज म्हणाले – आमची […]
अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ करण्याचा प्रस्ताव तातडीने केंद्र शासनाकडे पाठविणार, मंत्री दीपक केसरकर यांची माहिती
नागपूर : अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. जिल्ह्याची माहिती आल्यानंतर केंद्र शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठविणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली. अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा प्रश्न सदस्य गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला होता. प्रश्नाला उत्तर देताना मंत्री केसरकर बोलत होते. मंत्री केसरकर यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार […]
शिर्डी-अहमदनगरच्या विकासात समृद्धी आणणारा महामार्ग!
अहमदनगर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी असा ५२० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यातील वाहतूक-दळणवळण सेवेचे ११ डिसेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. समृद्धी महामार्गाची अहमदनगर जिल्ह्यातील लांबी २९.४० किलोमीटर असून कोपरगाव इंटरचेंज पासून शिर्डी १० किलोमीटर आहे. अहमदनगर मुख्यालयाचे अंतर ११० किलोमीटर आहे. समृद्धी महामार्गालगत जिल्ह्यात २ कृषी […]
अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे कालव्याचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करावे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे कालव्याचे काम डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत पूर्ण करून या भागातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होईल यासाठी जलसंपदा विभागाने प्रयत्न करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. निळवंडे कालव्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, जलसंपदा विभागाचे अपर […]
महाराष्ट्रात कुठे आणि कधी सुरु असतो ‘काजवा महोत्सव’? जाणून घ्या.
पुणे : रात्रीच्या वेळी दिसणारे काजवे प्रत्येकासाठी आकर्षण असतात. तसेच काजव्यांचा समून दिसणे ही तर एक पर्वणीच ठरते. क्वचितच असे प्रसंग घडतात. जून महिन्यात अनेक ठिकाणी ‘काजवा महोत्सव’ सुरू होतात. या ठिकाणी भेट देऊन तुम्ही काजव्यांच्या असंख्य समूहांना एकत्र पाहण्याचा आनंद घेऊ शकता. आपण अनेकदा चित्रपटांमध्ये काजव्यांचे समूह पाहिले असतील. रात्रीच्या वेळी दिसणाऱ्या काजव्यांचा समूह […]
अहमदनगर जिल्ह्यातील १०४२ जलस्त्रोतांचे होणार पुनरुज्जीवन
अहमदनगर : सिंचनातून समृद्धी वाढविण्यासाठी राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी हाती घेतलेली मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरणार आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेक तलावांची डागडुजी, दुरुस्ती करुन साठवण क्षमता व सिंचन क्षमता पुनरस्थापित करण्यात येणार आहे, असे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले. ‘मुख्यमंत्री जलसंधारण योजनेच्या अंमलबजावणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसमवेत मंत्री गडाख यांनी […]
पुण्यासह नगरमध्ये पुढील 3 ते 4 तासांत जोरदार पाऊस, वादळी वारे वाहण्याची शक्यता…
पुणे : पुढील 3 ते 4 तासांत पुणे, अहमदनगर जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर 30-40 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची देखील शक्यता आहे. अशा परिस्थितीत घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. पुण्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, या ढगाळ वातावरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात दिवसाच्या […]
डॉक्टरची आरोग्य केंद्रातच आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलेल्या कारणामुळे अहमदनगर जिल्ह्यात खळबळ
अहमदनगर : डॉक्टरने आरोग्य केंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातल्या करंजी येथे ही घटना घडली. डॉ. गणेश शेळके असं आत्महत्या केलेल्या डॉक्टरांचं नाव असून त्यांनी सुसाईड नोटमध्ये आत्महत्येला तालुका वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी जबाबदार असल्याचे लिहीले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करंजी येथील प्राथमिक […]
धक्कादायक : ग्रामपंचायत सदस्यावर गोळीबार, पाच गोळ्या झाडून हल्लेखोर पसार
अहमदनगर : नेवासा तालुक्यात बऱ्हाणपूर ग्रामपंचायत सदस्यावर पाच गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली असून त्यामध्ये हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर पळून गेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बऱ्हाणपूर ग्रामपंचायतीचे सदस्य संकेत चव्हाण मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास कांगोणी […]










