पुणे : राज्याचे जलसंपदा मंत्री व मराठा आरक्षण संदर्भात स्थापन केलेल्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्यात सारथी संस्थेला भेट देऊन योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला. ग्रामीण भागातील लक्षित गटांपर्यंत योजनांचा विस्तार करणे, युवकांना रोजगाराभिमुख योजना उपलब्ध करून देणे तसेच सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी नव्या संधी उपलब्ध करणे यावर त्यांनी विशेष भर दिला. या […]
टॅग: मराठा आरक्षण
सरकारने मान्यता दिलेलं ‘हैदराबाद गॅझेट’ – पुरावा म्हणून किती महत्त्वाचं? सविस्तर जाणून घ्या…
मुंबई : मराठा आरक्षणाच्या संदर्भात सध्या चर्चेत असलेलं ‘हैदराबाद गॅझेट’ म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. प्रत्यक्षात हे गॅझेट म्हणजे तत्कालीन हैदराबाद संस्थानकडून निघणारं सरकारी राजपत्र (Government Gazette) असून, ते आजही ऐतिहासिक आणि कायदेशीर दृष्टीने महत्त्वाचं मानलं जातं. काय आहे ‘हैदराबाद गॅझेट’? 1948 पूर्वी मराठवाडा भाग हैदराबाद संस्थानच्या अखत्यारीत होता. त्या काळात सरकारकडून […]
मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मोठं यश, मराठा आरक्षणासाठी मसुद्यातील प्रमुख मुद्दे जाणून घ्या…
मुंबई : मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील मराठा आंदोलनाला मोठं यश मिळाले आहे. मराठा समितीने हैदराबाद गॅझेट मान्य असल्याचे जाहीर केले असून, उपसमितीने गावातील, नात्यातील आणि कुळातील लोकांची चौकशी करून कुणबी प्रमाणपत्र देण्याची तयारी केली आहे. तसेच सातारा गॅझेटच्या मागणीवरही जलदगतीने निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपसमितीने मान्य केले. मनोज जरांगे यांनी सांगितले की, मराठा आंदोलनाच्या मागण्यांवर […]
उद्या 4 वाजेपर्यंत मुंबईचे रस्ते खाली करा, मराठा आंदोलकांना हायकोर्टाचे स्पष्ट निर्देश
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सध्या मुंबईतील आझाद मैदानात सुरू आहे. त्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महापालिका मुख्यालय परिसर, चर्चगेट स्थानक, हुतात्मा चौक आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलक जमले असून दक्षिण मुंबईतील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर मुंबई हायकोर्टात आज […]
पुण्यात आज मराठा आरक्षण शांतता रॅली; वाहतुकीत मोठे बदल, ‘या’ भागातील रस्ते राहणार बंद
पुणे : शहरात सारसबागेपासून आज (रविवारी) सकाळी मराठा आरक्षण शांतता रॅली निघणार असल्याने रॅली मार्गावरील वाहतुकीमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. रॅली गेल्यानंतर मार्ग पूर्ववत सुरू केले जाणार आहेत. शांतता रॅली सारसबाग, पुरम चौक, शनिपार, सेवा सदन चौक, अप्पा बळवंत चौक, गाडगीळ पुतळा, शिवाजी […]
मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, चार-पाच जणांनी हात पाय धरून लावले सलाईन; म्हणाले, सलाईन लावून बेगडी उपोषण करणार नाही
मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील हे १३ जुलैपासून उपोषणाला बसले होते. मात्र आता त्यांनी त्यांचं उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने मनोज जरांगेंकडे दोन महिन्याची मुदत मागितली होती. मात्र, मनोज जरांगे यांनी सरकारला १३ जून ते १३ जुलैपर्यंत एक महिन्याचा अवधी दिला होता. १३ जुलैपर्यत सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली न काढल्यामुळे […]
मनोज जरांगेची तब्येत खालावली; बीपी अन् शुगरही कमी; डॉक्टरांकडून तपासणी, उपचाराचा सल्ला
जालना : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी २० जुलैपासून पुन्हा आमदार उपोषण सुरू केलं आहे. सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत त्यांनी आपलं उपोषण सुरू केलं असून आज उपोषणाचा ४ था दिवस आहे. सोमवारी जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर निशाणा साधला होता. तसेच, देशाचे […]
मराठा समाजाला आरक्षण मिळणार का? राष्ट्रपतींचे घटनादुरुस्ती विधेयकावर शिक्कामोर्तब
नवी दिल्लीः राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी १२७ व्या घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली आहे. यामुळे या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले असून राज्यांना आरक्षणाचा अधिकार मिळाला आहे. देशातील सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना आपल्या स्तरावर वेगवेगळ्या मागास समाजांना आरक्षण देता येणार आहे. तसंच त्यांचा कोटा ठरवण्याचा अधिकारही असणार आहे. पण हे विधेयक अपूर्ण असल्याचा आरोप विरोधकांनी […]
मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्यासाठी ५० टक्के मर्यादाही शिथिल करा, केंद्राकडे मागणी
मुंबई : एसईबीसी जाहीर करण्याचे अधिकार राज्यांना बहाल करून मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार नाही. मराठा आरक्षण द्यायचे असेल तर केंद्र सरकारने आरक्षणाची ५० टक्के मर्यादाही शिथिल करावी, असे मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. एसईबीसी जाहीर करण्याचे अधिकार राज्यांना बहाल करण्याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना ते […]
मुख्यमंत्री-पंतप्रधान बैठकीत ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा, मुख्यमंत्र्यांनी भेटीबाबत व्यक्त केलं समाधान
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज झालेल्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी मराठा आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण, पदोन्नतीमधील आरक्षण, मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गमधील जागा, जीएसटी परतावा आणि पीकविम्याच्या अटी-शर्ती, चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या किनारपट्टी भागातील नुकसानीचे एनडीआरएफचे निकष, मराठी भाषेला अभिजात दर्जा देणं या मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली. […]










