The country would be on fire, Rahul Gandhi's statement against agricultural laws
देश

..नाहीतर देशात सर्वत्र आग लागेल, कृषी कायद्यांच्या विरोधात राहुल गांधींचं वक्तव्य

आपल्या संसदीय मतदार संघ वायनाड येथील दौऱ्यावर असलेले कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी तीनही कृषी कायद्यांचा विरोध केला. ते म्हणाले, सत्य हे आहे की बहुतेक शेतकऱ्यांना तिन्ही कृषी कायद्यांचे तपशील समजत नाहीत, कारण जर त्यांना हे समजले तर संपूर्ण देशात आंदोलन केले जाईल, देशात सर्वत्र आग लागेल.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बुधवारी राहुल गांधींनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे निवेदन ट्वीट करून तीनही कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली. महात्मा गांधींचे विधान ‘तुम्ही विनम्रपणे जगाला हलवू शकता’, राहुल यांनी ट्विट केले. राहुल गांधी यांनी पुढे लिहिले की, पुन्हा एकदा मोदी सरकारला आवाहन करतो कि कृषी-विरोधी कायदा त्वरित मागे घ्यावा.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत