Chief Minister Eknath Shinde Not Feeling Well, doctors advised him to rest
महाराष्ट्र सोलापूर

सांगोला-मिरज मार्गावर कारने चिरडल्याने 8 वारकऱ्यांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा

सोलापूर : कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना सांगोला-मिरज मार्गावर वाहनाने चिरडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये तातडीच्या मदतीची देखील त्यांनी घोषणा केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

विठ्ठलाचे नामस्मरण करत ही दिंडी पायी पंढरपूरकडे रवाना झालेली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी या गावातील रहिवासी या दिंडीमध्ये होते. एकूण 32 जण या दिंडीमध्ये होती अशी माहिती आहे. त्यापैकी 8 जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पाच महिलांचा आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. एका चिमुकल्याला देखील यामध्ये जीव गमावावा लागला आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास दिंडी सांगोला तालुक्यातील जुनोनी जवळील बायपास रस्त्याजवळ आली होती. याच वेळी मिरजकडून भरधाव वेगात एक कार आली. ही कार थेड दिंडीमध्ये घुसली आणि एकामागून एक वारकऱ्यांना चिरडत गेली. घटनेची माहिती मिळताल पोलिस तात्काळ घटनास्थळी हजर झाले. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुख्यमंत्र्यांनी हे वृत्त कळताच तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला तसेच या घटनेतील जखमी वारकऱ्यांना ताबडतोब योग्य ते उपचार देण्यात यावे असे निर्देश दिले. हा अपघात कसा झाला याविषयी तातडीने चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत