Chance of heavy rain with thunderstorms
महाराष्ट्र मुंबई

पुढील 2 ते 3 तासात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, ‘या’ ४ जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई : हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात ४ जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 2 ते 3 तासात जळगाव, नाशिक, अहमदनगर, छ. संभाजीनगर या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागात ३० ते ४० किमी प्रतितास या वेगाने वादळी वारे वाहतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दरम्यान, अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्याची माहिती आहे. या चक्रीवादळाचा वेग वाढत असून हे चक्रीवादळ आता उत्तरेच्या दिशेने पुढे सरकत असल्याची माहिती आहे. चक्रीवादळ खोल समुद्रात असल्याने मुंबईसह कोकण किनारपट्टीवर जास्त पावसाची शक्यता नाही. मात्र, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असून पुढील ५ दिवस खोल समुद्रात मच्छिमारीसाठी जाऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत