uddhav-thakrey
नागपूर महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांकडून नागपूर येथील पूरामुळे नुकसान झालेल्या व्यक्तींना मदत जाहीर

नागपूर जिल्हयात नवेगाव खैरी प्रकल्पातून सरासरी ६८३९ क्युमेक व तोतलाडोह प्रकल्पातून ६६९३ क्युमेक पाण्याचा विसर्ग होत असून एकूण २५ गावांना पुराचा विळखा पडला आहे. त्यामुळे २ हजार ९०७ कुटुंबांतील ११ हजार ६४ व्यक्तींना फटका बसला आहे. अनेक नागरिकांचे शाळा व समाजभवन येथे स्थलांतरण करण्यात आले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

या सर्व नागरिकांचे प्रचंड हाल झाले. पूर परिस्थितीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले, त्यामुळे याची दखल घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नागपूर विभागात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या व्यक्तींना १६ कोटी ५० लाख रुपयांची मदत वाटप करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये घरगुती सामान, कच्ची व पक्की घरे त्याचबरोबर मदत छावण्या यासाठीच्या अर्थसहाय्याचा देखील समावेश आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत