मुंबई : 24 वर्ष एकत्र राहिल्यानंतर सोहेल खान आणि सीमा सचदेव-खान यांनी शुक्रवारी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. विभक्त जोडपे आज मुंबईतील कौटुंबिक न्यायालयातून बाहेर पडताना दिसले. सीमा आणि सोहेलने अद्याप त्यांच्या घटस्फोटाबाबत अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही. मात्र, ते काही काळापासून वेगळे झाले आहेत.
1998 मध्ये लग्नगाठ बांधल्यानंतर, सोहेल आणि सीमा यांनी 2000 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचे, मुलगा निर्वान खानचे स्वागत केले. त्यानंतर जून 2011 मध्ये सरोगसीद्वारे या जोडप्याचा दुसरा मुलगा योहानचा जन्म झाला. गेल्या वर्षी, त्यांच्या कुटुंबाने योहानचा 10 वा वाढदिवस साजरा केला. शुक्रवारी कौटुंबिक न्यायालयातून सोहेल आणि सीमा स्वतंत्रपणे बाहेर पडताना दिसले. न्यायालयीन सूत्राने ETimes ला खुलासा केला कि, “सोहेल खान आणि सीमा सचदेव आज न्यायालयात हजर होते. त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. दोघेही एकमेकांबरोबर सामान्य आणि मैत्रीपूर्ण वागत होते.”
प्यार किया तो डरना क्या या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेता-निर्माता सोहेल खान याची पहिली भेट दिल्लीत राहणाऱ्या सीमा यांच्याशी झाली होती. त्यावेळी सीमा मुंबईत राहात होती आणि फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर करत होती. सोहेल आणि सीमाने डेट करण्यास सुरुवात केली आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सीमाच्या कुटुंबीयांनी लग्नाला मान्यता दिली नाही. त्यानंतर सोहेल आणि सीमा यांनी घरातून पळ काढला आणि जवळच्या मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत आपापल्या धर्माचे पालन करून गुपचूप लग्न केले होते.




