नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने एटीएमसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने म्हटले आहे की ज्या बँकेच्या एटीएममध्ये पैसे नसतील, त्यांच्याकडून दहा हजार रुपये दंड आकारला जाईल. या परिस्थितीत ग्राहक रिझर्व्ह बँकेच्या सोशल मीडिया अकाऊंटवर किंवा फोन नंबर 011-23711333 वर कॉल करून तक्रार करू शकतात.
देशातील सर्वात मोठ्या बँकेने व्हाईट लेबल एटीएम ऑपरेशनसाठी नियम जारी केले आहेत. WLAO कंपन्यांच्या माध्यमातून ATM मध्ये पैसे टाकले जातात. RBI ने सूचना दिल्या आहेत की ATM मध्ये पैसे संपणार नाहीत याची बँकांना काळजी घ्यावी लागेल. नियम न पाळणाऱ्या बँकेकडून दंड आकारला जाईल. हा नियम 1 ऑक्टोबर 2021 पासून लागू होणार आहे.
आरबीआयचे निर्देश
आरबीआयने म्हटले आहे की एटीएममध्ये पैसे संपणार नाहीत, याची खात्री बँकांना करावी लागेल. यासाठी बँका आणि डब्ल्यूएलएओला वॉच ठेवावा लागेल. पैसे संपल्यानंतर एटीएममध्ये रोख रक्कम लवकरात लवकर जमा करावी, जेणेकरून जनतेला कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही. अन्यथा ग्राहक रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करू शकतो.
जर बँकेला किंवा डब्ल्यूएलएओला दंडाच्या विरोधात अपील करायचे असेल तर क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल. यासाठी एक महिन्याच्या आत अपील दाखल करावे लागेल.




