काँग्रेस खासदार राहुल गांधीसोबत उत्तर प्रदेशचे पोलीस वागत होते, त्यांची कॉलर पकडली, धक्काबुक्की केली, जमिनीवर पाडलं हे चित्र कोणत्याही सुसंस्कृत समाजाला आणि राजकारणाला शोभा देणारं नाही याचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निषेध केला आहे. इतकंच नाही तर या देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाहीवरचा हा सामूहिक बलात्कार असल्याचं सांगत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. ते […]
राजकारण
Stay updated with the latest political news from Maharashtra and India. Our Politics News section covers government policies, political events, leadership updates, and all major developments at both state and national levels.
राहुल गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांकडून अटक, कॉंग्रेस नेत्याने विचारले- कोणत्या कलमाखाली अटक केली जात आहे
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली असल्याचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे. कलम १८८ अंतर्गत पोलिसांकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. काँग्रेसकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी योगी आदित्यनाथ यांना कशाची भीती […]
मराठा आरक्षणावरुन पार्थ पवार आक्रमक; सुप्रीम कोर्टात जाण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही – पार्थ पवार
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवारांचे नातू पार्थ पवार यांनी पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात जात मराठा आरक्षणावरुन सुप्रीम कोर्टात जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नसल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी लवकरात लवकर तोडगा काढावा अशी विनंतीही सरकारकडे केली आहे. बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाने आत्महत्या केल्यानंतर पार्थ पवार आक्रमक झाल्याचं दिसत आहे. पार्थ पवार यांनी ट्विट […]
कृषी विधेयकाला विरोध करणाऱ्यांवर पीएमओची टीका
आज केंद्र सरकार शेतकऱ्यांना त्यांचा हक्क देत असतानाही हे लोक निषेधावर उतरले आहेत. या लोकांना अशी इच्छा आहे की देशातील शेतकरी आपले उत्पादन खुल्या बाजारात विकू शकणार नाहीत. हे लोक आता शेतकरी ज्या वस्तू व उपकरणांना पूजा करतात त्या वस्तू पेटवून शेतकर्यांचा अपमान करीत आहेत.. असे ट्विट प्रंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आले आहे. आज जब केंद्र […]
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना करोनाची लागण
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत गेल्या दहा दिवसांपासून विलगीकरणात आहेत. उदय सामंत यांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली कि प्रकृती चांगली असून आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. उदय सामंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “गेले दहा दिवस […]
अदर पूनावाला यांनी केलं पंतप्रधान मोदींचं कौतुक..
भारताच्या लशीचं उत्पादन आणि लशीच्या वितरणाची क्षमता संपूर्ण मानवतेला संकटातून बाहेर काढण्याच्या कामी येईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत म्हटलं होतं. यावर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. जगाला लस पुरवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनला आमचा पाठिंबा आहे. हा भारतासाठी अभिमानाचा क्षण […]
शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाइनमध्ये राहण्याची मोठी भूक लागली – संजय निरुपम
मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतल्या हयात हॉटेलमधील भेटीवर संजय निरुपम यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी राऊतांवर नाव न घेता टीका केली आहे. यात त्यांनी संजय राऊत यांनी याआधी केलेल्या विधानावरही टीकास्त्र सोडलं आहे. संजय निरुपम आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ” असे वाटतेय की शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाइनमध्ये […]
माजी केंद्रीयमंत्री जसवंत सिंह यांचे निधन
माजी केंद्रीयमंत्री जसवंत सिंह यांचे आज निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. याचबरोबर पंतप्रधान मोदी यांनी देखील जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. अगोदर एका सैनिकाच्या रुपात आणि नंतर राजकारणातील आपल्या प्रदीर्घ कार्यकाळाद्वारे जसवंत सिंह यांनी देशाची कायम सेवा केली असल्याचे पंतप्रधान मोदी […]
जेव्हा भारत कोणाशी मैत्रीचा हात पुढे करतो तेव्हा तो तिसऱ्या देशाविरोधात नसतो – पंतप्रधान
दिल्ली : जेव्हा भारत कोणाशी मैत्रीचा हात पुढे करतो तेव्हा तो तिसऱ्या देशाविरोधात नसतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत केले. भारतानं कायमचं विश्वकल्याणाला प्राधान्य दिलं असल्याचंही त्यांनी यावेळी जगाला सांगितंल. मोदी म्हणाले, “भारतानं जर कोणाला मैत्रीचा हात दिला तर त्याचा अर्थ तो कधीच तिसऱ्या देशाच्या विरोधात आहे असा होत नाही. भारत […]
देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या भेटीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या.. जाणून घ्या प्रतिक्रिया
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही काहीही घडू शकतं, आम्ही कोणतीही गोष्ट नाकारत नाही अशी सूचक प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांनी भेट घेऊन दोन तास चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. भेटीची माहिती समोर आल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विविध आडाखे बांधले जात आहेत. […]









