मुंबई : महाराष्ट्रातील हवामानात लक्षणीय बदल होत असून नागरिकांना थंडी, पाऊस आणि वाढत्या तापमानाचा एकाच वेळी सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात जाणवणारी तीव्र थंडी आता हळूहळू ओसरत असून, त्याचबरोबर अनेक भागांत पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्राच्या काही भागांवर होणार आहे. […]
मुंबई
दावोस दौरा शंभर टक्के यशस्वी; ३७ लाख कोटींचे सामंजस्य करार, सुमारे ४३ लाख रोजगारनिर्मिती – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत
मुंबई : दावोस (स्वित्झर्लंड) येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आतापर्यंत एकूण ३७ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले असून, त्यातून राज्यात सुमारे ४३ लाख युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे दावोस दौरा शंभर टक्के यशस्वी ठरलेला आहे, अशी माहिती उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. उद्योगमंत्री सामंत म्हणाले […]
मुंबई व पुणे विद्यापीठांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याबाबत बैठक
मुंबई : राज्यातील अनेक आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी दुर्गम भागातून मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये येतात. या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक परिसरात राहण्याची सोय व्हावी यासाठी मुंबई व पुणे विद्यापीठाच्या परिसरात वसतिगृह उभारण्यासंदर्भात आढावा बैठक आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश […]
गडचिरोली जिल्ह्यात टसर रेशीम कोष बाजारपेठ उभारणीस मान्यता
मुंबई : राज्यातील टसर रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनास योग्य व हमखास दर मिळावा, तसेच पूर्व विदर्भातील टसर रेशीम मूल्यसाखळी अधिक बळकट व्हावी, या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथे शासकीय टसर रेशीम कोष बाजारपेठ उभारण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३–२८ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला असून, या प्रकल्पासाठी ₹३.८८ कोटी […]
अक्षय कुमारच्या गाडीला धडक! जुहूमध्ये थरारक अपघात, व्हिडीओ व्हायरल
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांच्या ताफ्यातील गाडीचा मुंबईत भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात जुहू परिसरात घडला असून, अक्षय कुमार आणि त्यांची पत्नी एका गाडीतून विमानतळावरून घरी जात असताना ही घटना घडली. सुदैवाने अक्षय कुमार आणि त्यांच्या पत्नीला कोणतीही इजा झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमार यांच्या […]
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ 10 मोठे निर्णय, मुंबईकरांना मोठे गिफ्ट…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत एकूण 10 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये अटल बिहारी वाजपेयी शिवडी–न्हावाशेवा अटल सेतूवरील पथकरात आणखी एका वर्षाची सवलत, तसेच नगर विकास, नियोजन, महसूल व इतर विभागांशी संबंधित महत्वाचे निर्णय सामावले होते. सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या या बैठकीस मंत्रिमंडळातील अनेक सदस्य […]
राज्यात चार दिवस कडक दारूबंदी! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; नियमभंग करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई
मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांना अवघे काही दिवस उरले असताना, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग (SEC) आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि मतदान प्रक्रिया निष्पक्ष व्हावी यासाठी १३ ते १६ जानेवारी २०२६ या कालावधीत संपूर्ण राज्यातील प्रमुख शहरांमध्ये “ड्राय डे” लागू करण्यात आला आहे. अधिसूचनेनुसार, मुंबई, पुणे, […]
आरोग्य विभागाअंतर्गत बदल्या, पदोन्नतीसाठी ‘एसएचएसआरसी’चे मूल्यांकन प्रमाण मानण्याच्या सूचना
मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, पदोन्नती करताना ‘राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र’ (एसएचएसआरसी) च्या प्रणालीनुसार कामगिरीवर आधारित मूल्यांकन अहवालानुसार पारदर्शकपणे कार्यवाही करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. या संदर्भात परिषद सभागृह, मंत्रालय येथे नवीन तांत्रिक कोर्सेस, नवीन प्रशिक्षणांचे नियोजन, वैद्यकीय अधिकारी, नर्सेस आणि तांत्रिक कर्मचारी […]
राज्यभर १ ते ३१ जानेवारी दरम्यान ‘रस्ता सुरक्षा अभियान’
मुंबई : रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्यभर 1 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना हे अभियान साजरे करण्यात येणार आहे. यानिमित्ताने संपूर्ण राज्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत परिवहन विभाग, वाहतूक पोलीस […]
दिव्यांगांच्या विशेष शाळांतील अतिरिक्त शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी सर्वसमावेशक कार्यपद्धती
मुंबई : राज्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा व कार्यशाळांमधील नोंदणी प्रमाणपत्र रद्द होणे, नूतनीकरण न करणे तसेच पटनिर्धारणानंतर विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी सर्वसमावेशक व एकसंध कार्यपद्धती निश्चित केली आहे, अशी माहिती दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दिली. सचिव मुंढे म्हणाले, यापूर्वी विविध शासन निर्णय, परिपत्रके व शाळा […]









