मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे आणि सातारा जिल्ह्यांमध्ये शुक्रवारसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.
IMD ने दुपारी 1 वाजता म्हटले की मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये पुढील 4 तासांत मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील ३-४ तासात पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडाटाची शक्यता आहे.




