मुंबई : 1 जुलै रोजी समृद्धी एक्स्प्रेस वेवर अपघात झालेल्या बसमधील 25 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. घटनेच्या दिवशी ड्रायव्हरच्या रक्ताच्या नमुन्यात कायदेशीर अल्कोहोल मर्यादेच्या 30 टक्क्यांहून अधिक होते. अधिकार्यांच्या मते 30% कायदेशीर अल्कोहोलचे प्रमाण खूप जास्त आहे आणि ते वाहन चालविण्यास धोकादायक आहे. दारूमुळे चालकाला तंद्री लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या (RFSL) अहवालात ही बाब समोर आली आहे. एका वरिष्ठ अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, मर्यादेपेक्षा 30 टक्के जास्त मद्यपान ड्रायव्हिंगसाठी धोकादायक मानले जाते. महाराष्ट्रात 100 मिली रक्तातील अल्कोहोल सामग्रीची अनुज्ञेय मर्यादा 30mg (0.03%) आहे.
तत्पूर्वी, पुराव्यांवरून असे दिसून आले आहे की ड्रायव्हर झोपल्यामुळे बस भिंतीवर आदळली असावी. दारुच्या परिणामामुळे ड्रायव्हरला तंद्री लागली असण्याची शक्यता आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. आरोपी ड्रायव्हर, शेख दानिश, जो सध्या पोलिस कोठडीत आहे, त्याच्यावर भादंवि कलम ३०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता, त्याच्या रक्ताच्या नमुन्याच्या अहवालावरून त्याला दोषी ठरवून दंडासह 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. अपघातानंतर चालकाला रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले.
आरएफएसएल अहवालात पुढे म्हटले आहे की आग डिझेलमुळे लागली होती आणि ती खूप वेगाने पसरली होती, ज्यामुळे 25 प्रवाशांचा मृत्यू झाला, ते वाचू शकले नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बसने 25 वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे तपासात समोर आले असून त्यापैकी 19 दंड अद्याप भरलेले नाहीत.




