Sonia Gandhi aggressively removed the state presidents of all the five states
देश राजकारण

५ राज्यांतील पराभवानंतर सोनिया गांधी आक्रमक, पाचही राज्याच्या प्रदेशाध्यक्षांना हटवले

नवी दिल्ली : गेल्या ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर काँग्रेसने आत्मचिंतन करण्याचा निर्णय घेतला असून पहिले महत्वाचे पाऊल म्हणून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या ५ राज्यांमधील प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा मागितला आहे. पक्षाचे जनरल सेक्रेटरी रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

या पराभवानंतर काँग्रेसच्या कार्यसमितीची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत पराभवावर विचारमंथन करण्यात आले. त्यानंतर आज पराभव झालेल्या ५ राज्यांमधील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा घेत सोनिया गांधी यांनी आक्रमकपणे परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.  उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरच्या पीसीसी अध्यक्षांना पीसीसीच्या पुनर्रचनेसाठी राजीनामे देण्यास सांगितले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत