नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान, आयकर स्लॅबमधील बदलाबाबत मध्यमवर्गीयांला मोठ्या आशा होत्या, परंतु अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणामुळे त्यांची निराशा झाली आहे. हा सलग सातवा अर्थसंकल्प होता, ज्यामध्ये आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याशिवाय कपातीबाबत कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही.
सामान्य अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला पुन्हा मोठा झटका बसला आहे. आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तथापि, कॉर्पोरेट कर 18% वरून 15% करण्यात आला आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला अर्थसंकल्प, जाणून घ्या त्यांनी केलेल्या घोषणा…




