नवी दिल्ली : भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 90,928 नवीन रुग्ण आढळले आहेत. याशिवाय 325 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. बुधवारच्या तुलनेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये ५६.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
ओमिक्रॉन प्रकाराबद्दल बोलायचे तर, देशातील ओमिक्रॉन प्रकरणांची संख्या 2,630 झाली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ओमिक्रॉनची सर्वाधिक 797 आणि 465 प्रकरणे आहेत. ओमिक्रॉनच्या 2,630 रुग्णांपैकी 995 रुग्ण बरे झाले आहेत.
कोरोनाच्या सर्वाधिक प्रकरणांमध्ये महाराष्ट्र (26,538 नवीन कोरोना प्रकरणे), पश्चिम बंगाल (14,022 प्रकरणे), दिल्ली (10,665 प्रकरणे), तामिळनाडू (4,862 प्रकरणे) आणि केरळ (4,801 प्रकरणे) यांचा समावेश आहे. नवीन 90,928 प्रकरणांपैकी 66.97 टक्के प्रकरणे फक्त पाच राज्यांमधून आली आहेत. यामध्ये 29.19 टक्के प्रकरणे केवळ महाराष्ट्रातील आहेत.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात कोरोना विषाणूचे 90,928 नवीन रुग्ण आढळले आहेत, 19,206 बरे झाले आहेत आणि 325 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत देशात झालेल्या 325 मृत्यूंपैकी केरळमध्ये (258) सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.
- एकूण प्रकरणे : 3,51,09,286
- सक्रिय प्रकरणे : 2,85,401
- बरे झालेले एकूण रुग्ण : 3,43,41,009
- एकूण मृत्यू : ४,८२,८७६
- एकूण लसीकरण : 1,48,67,80,227
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) नुसार, काल भारतात कोरोना विषाणूसाठी 14,13,030 नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या, कालपर्यंत एकूण 68,53,05,751 नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.




