पुणे : बाणेर येथील ऋतुरंग पार्क सोसायटीच्या आवारात झाडाच्या फांद्या तोडण्याच्या कामादरम्यान झालेल्या दुर्घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला. ही घटना २७ जुलै रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. या प्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात ठेकेदार व सोसायटी पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव लहू गुलाब क्षीरसागर (वय ६६, रा. इंगवले चौक, […]
टॅग: महाराष्ट्र बातम्या
महिला अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी, वाशिम येथे विशेष न्यायालये
मुंबई : महिला अत्याचाराची प्रकरणे गतीने निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशिम येथे विशेष न्यायालये स्थापन करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. नव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या या तीन न्यायालयांसाठी प्रत्येकी ५ नियमित पदे (१ जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, १ लघुलेखक, १ अधीक्षक, १ वरिष्ठ लिपिक, १ कनिष्ठ लिपिक) […]
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात ११ जणांवर आरोपपत्र दाखल
पुणे : वैष्णवी शशांक हगवणे हिच्या हुंड्यासाठी झालेल्या छळामुळे आत्महत्येप्रकरणी बावधन पोलिसांनी सोमवारी पुणे सत्र न्यायालयात एकूण ११ आरोपींविरुद्ध सविस्तर आरोपपत्र दाखल केले आहे. बावधन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल विभूते यांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्बल १,६७० पानी आरोपपत्र प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अलिशा बागल यांच्या न्यायालयात सादर करण्यात आले असून, त्यामध्ये सर्व आरोपींविरुद्ध ठोस पुरावे सादर […]
डॉक्टरची कार उलटून अपघात, पादचाऱ्यासह तिघांना गंभीर दुखापत
पुणे : पुण्यातील रस्ते सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त करणारी घटना सोमवारी सकाळी पिंपरी-चिंचवडमध्ये घडली. रामकृष्ण नाट्यगृहाजवळ एका डॉक्टरची कार उलटून झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले. या घटनेमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर तसेच रस्ते पायाभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साधारण ११ वाजताच्या सुमारास डॉक्टर आपल्या टाटा टियागो (MH 14 JA 0262) या […]
जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता – मंत्री संजय राठोड
मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या सर्व पदांना आता हाय पॉवर कमिटीने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आता लवकरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही भरती प्रक्रिया जलदारित्या राबविली जाईल, अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली. विरोधी पक्षनेते […]
आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार
मुंबई : आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री श्रेत्र पंढरपूर ला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाने यात्राकाळात ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते आषाढी एकादशीच्या नियोजनासाठी पंढरपूर येथे बोलावलेल्या एसटीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे […]
सात वर्षांच्या चिमुकल्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू
सोलापूर : सोलापूर-विजापूर रोडवरील सोरेगाव येथे सोमवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली. सात वर्षांचा ऋषी लक्ष्मण भरले या चिमुकल्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली असून, परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऋषी शौचासाठी घराशेजारी असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ गेला होता. परंतु बराच वेळ झाला तरी तो घरी परतला […]
समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार; हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिक : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे. हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरणार आहे. येत्या काळात या महामार्गाला वाढवण बंदराशी जोडण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण व सायन पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण […]
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणार
मुंबई : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापन करण्यास तसेच आयोगासाठी पदनिर्मिती, जागा व अनुषंगिक खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. केंद्रीय स्तरावर देशात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्याकरिता दोन स्वतंत्र आयोग आहेत. या दोन्ही आयोगांशी निगडीत विषय वेगेवगळे आहेत. त्यामुळे दोन स्वतंत्र आयोग असणे आवश्यक […]
झुडपी जंगलाबाबतच्या निर्णयाने विदर्भाच्या विकासाला चालना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : झुडपी जंगलाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आहे. तो विकास आणि पर्यावरणाचा समतोल राखणारा आहे. या निर्णयामुळे विदर्भाच्या विकासाला मोठी चालना मिळेल आणि नागपुरात तर झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नागपूर येथे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना ते बोलत होते. ते […]










