पुणे : खडकवासला धरण प्रशासनाने मंगळवारी दुपारी मुठा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ केली आहे. दुपारी ४:०० वाजेपूर्वी १९,३३४ क्युसेक इतका असलेला विसर्ग २४,८२७ क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला असल्याची माहिती धरण अधिकाऱ्यांनी दिली. पाटबंधारे विभागाने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून घाटमाथ्यावर आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात जलसाठा वेगाने वाढत आहे. यामुळे धरणातील जलपातळी नियंत्रित […]
टॅग: पूरस्थिती
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
पुणे : खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात होणारा पाण्याचा विसर्ग मंगळवारी दुपारी वाढवण्यात आला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. धरणातून ११,८७८ क्युसेक इतका विसर्ग सुरू होता. मात्र, दुपारी २ वाजेपासून हा विसर्ग वाढवून १५,४४२ क्युसेक इतका करण्यात आला आहे. पावसाळा आणि धरणातील पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्गाची मात्रा पुढे आणखी वाढवली किंवा कमी केली जाऊ […]
राज्यात आज व उद्या अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई : मध्य भारतावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून याच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), मुंबई महानगर प्रदेश, आणि मराठवाड्यात (प्रामुख्याने पश्चिम आणि दक्षिण भाग) 18 ते 19 ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यात प्रामुख्याने कोकणातील सर्वच जिल्हे; नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पालघर, ठाणे, उर्वरित मुंबई महानगर; […]
पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात; एसडीआरएफ, एनडीआरएफ यंत्रणा सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पूर्व विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) सज्ज आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी यासंदर्भात सभागृहात विषय मांडला होता. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पूरस्थितीमुळे काही प्रवासी एसटी […]
महसूल विभागांतर्गत असलेल्या नाल्यांवरील अतिक्रमणे तत्काळ हटवण्याचे निर्देश
नागपूर : महसूल विभागाच्या अंतर्गत असलेल्या नाल्यांवर अतिक्रमणांचा विळखा वाढल्याने पावसाळ्यात अतिवृष्टी नसतांनाही पूर सदृष्य परिस्थिती निर्माण होते. अनेक भागात यामुळे शेतकऱ्यांना व काही ठिकाणी नागरिकांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला तोंड द्यावे लागते. पूरात भरडल्या जाणाऱ्या लोकांचा रोष हा शासनाला घ्यावा लागतो. वास्तविक ज्या कुणामुळे हे अतिक्रमण महसूल विभागाअंतर्गत असलेल्या नाल्यांवर केले गेले आहे त्यांच्याविरुध्द कठोर […]




