कर्नल श्यामसिंह भाटी यांचे गुरुवारी रात्री उशिरा निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. बांगलादेशच्या मुक्तीसाठी भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी मैनामतीच्या प्रसिद्ध लढाईचा नायक अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. कर्नल श्यामसिंह भाटी यांचा जन्म 1941 मध्ये जोधपूरच्या तापू गावात झाला. त्यांचे वडील ठाकूर खेतसिंह भाटी जोधपूर रियासतच्या सरदार इन्फंट्रीमध्ये अधिकारी होते. दुसर्या महायुद्धात ते सहभागी होते. […]

