मुंबई : मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठणाचा प्रयत्न करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याच्या आरोपाखाली आणि राजद्रोहाच्या खटल्यात तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याला अखेर जामीन मंजूर झाला आहे. प्रत्येकी ५०,००० रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला जाईल, असे विशेष न्यायाधीश आर.एन. रोकडे यांनी सांगितले. नवनीत राणा आणि रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी प्रक्षोभक वक्तव्य प्रकरणी २३ एप्रिलला त्यांच्या खार […]

