ऑस्ट्रेलियाने अखेरचा T२० सामना १२ धावांनी जिंकला. १८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार विराट कोहलीने ८५ धावांची खेळी केली. तरीही भारताला पराभवाचा सामना करावा लागला. अखेरचा सामना भारताने गमावला असला तरीही टी-२० मालिका भारताने २-१ ने जिंकली आहे. कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वेड(80) आणि मॅक्सवेल(५४) जोडीने चौफेर फटकेबाजी केली. […]

