मुंबई : आपले सरकार इथल्या मातीला नमन करणारे आहे. मराठी नाटक, मराठी सिनेमा, कला आणि लोककला तसेच लोकसंस्कृतीला प्रोत्साहन देणारे आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केले. सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचलनालय यांच्यातर्फे मराठी भाषा गौरव दिना निमित्त माटुंगा येथे ‘अमृतातेही पैजा जिंके’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मराठी […]
टॅग: government
शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन – पणन मंत्री अब्दुल सत्तार
मुंबई : शेती निसर्गावर अवलंबून असल्यामुळे त्यामध्ये अनेक प्रकारची अनिश्चितता असते. डोंगराळ व शेतकरी आत्महत्याग्रस्त भागांमध्ये शेतकरी हितासाठी शेतमाल प्रक्रिया सहकारी संस्थांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग उभारण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, असे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. कृषी प्रक्रिया सहकारी संस्थांना प्रकल्प उभारणीसाठी देण्यात येणारे भाग भांडवल कर्ज व शासकीय भाग भांडवल याबाबत पणन विभागामार्फत […]
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व सोयीसुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध – शिक्षणमंत्री दीपक केसरकर
नाशिक : प्रत्येक शालेय विद्यार्थ्याला सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे ध्येय असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व सोयी सुविधांसाठी शासन कटिबद्ध आहे. येत्या काळात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक धोरण ठरविण्यात येणार असल्याची ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. विभागीय शिक्षण मंडळ, नाशिक विभाग नाशिक येथे केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाचे अधिकारी […]
भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत शासनस्तरावर कार्यवाही सुरू – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील
मुंबई : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भीमा-आसखेड येथील प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांबाबत शासनाकडून कार्यवाही सुरू असल्याची माहिती, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. विधानपरिषद सदस्य सचिन अहीर यांनी महाराष्ट्र विधानपरिषद अधिनियम ९३ अन्वये केलेल्या सूचनेला उत्तर देताना मंत्री पाटील बोलत होते. मंत्री पाटील म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील भीमा-आसखेड प्रकल्पात एकूण १ हजार ४१४ प्रकल्पग्रस्त […]
महाप्रित उपकंपनी स्थापनेस शासन मान्यता
मुंबई : राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत कार्यरत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या “महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिक मर्यादित” (महाप्रित) या उपकंपनीच्या स्थापनेस शासन मान्यता देण्यात आली आहे. या कंपनीच्या उत्पन्नातून सुमारे 80 टक्के निधी हा राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी […]
‘नशा मुक्त भारत पंधरवडा’ साजरा करण्याचे शासनाचे आवाहन
मुंबई : केंद्र सरकारने अंमली पदार्थांच्या धोक्याविरुद्ध लढण्यासाठी ‘ड्रग मुक्त भारत’ हा संकल्प निश्चित केला आहे. त्याचे पालन करण्यासाठी, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने १२ ते २६ जून २०२३ या कालावधीत “नशा मुक्त भारत पंधरवडा” जाहीर केला आहे. अंमली पदार्थांच्या (ड्रग्स) दुष्परिणामांबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. ‘नशा मुक्त भारत पंधरवडा’ […]
75 हजार पोलिसांची भरती करण्याबाबत शासनाची घोषणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले ‘हे’ निर्देश
मुंबई : ७५ हजार पोलिसांची भरती करण्याबाबत शासनाने घोषणा केली आहे. ही प्रक्रिया वेगाने पूर्ण व्हावी तसेच पूर्णपणे पारदर्शी व्हावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सध्या ७२३१ पदांना मान्यता देण्यात येऊन पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रीया सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारिरिक चाचणी […]
जामशेत व ओतूर धरणाचे परिपूर्ण प्रस्ताव शासनास सादर करावे, डॉ. भारती पवार यांच्या सूचना
नाशिक : जामशेत व ओतूर धरणांचे प्रस्ताव शासनास सादर करताना ते परिपूर्ण असावेत, अशा सूचना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्या आहेत. शासकीय विश्रामगृह येथे जलसंपदा व जलसंधारण विभागाच्या ओतूर व जामशेत या धरणाच्या कामांचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी डॉ. पवार बोलत होत्या. या बैठकीस जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता संजय […]
लम्पी नियंत्रणासाठी जनावरांच्या सरसकट लसीकरणास शासनाची मान्यता
मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांत लम्पी प्रतिबंधासाठी ४९.८३ लाख लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामधून बाधित क्षेत्राच्या ५ किमी. परिघातील १२२९ गावातील १९.५५ लाख जनावरांचे मोफत लसीकरण करण्यात आले असून व गोशाळा व मोठ्या गोठ्यांमध्ये किंवा जास्त संख्येने जनावरे असलेल्या ठिकाणी पुढील लसीकरण सुरू आहे. शासनाने महाराष्ट्रातील प्रत्येक पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रात सरसकट लसीकरण करण्यासाठी […]
आता ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात सूट दिली जाणार नाही, केंद्राने केला ‘हा’ युक्तिवाद
नवी दिल्ली : केंद्र सरकार आर्थिक आघाडीवर सर्वसामान्यांना एकापाठोपाठ एक झटके देत आहे. दरम्यान, आता केंद्राने ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात सूट दिली जाणार नसल्याचे सांगितले आहे. सूट दिल्याने रेल्वेचे नुकसान होते, असा सरकारचा युक्तिवाद आहे. वास्तविक, कोरोनापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटांवर ५० टक्क्यांपर्यंत सूट मिळायची. मात्र कोरोनाच्या काळात ही सुविधा बंद करण्यात आली होती. तेव्हा […]










