कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आज भारत बंद पुकारला आहे. त्यामुळे देशभरात ठिकठिकाणी रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिमाण होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला चार महिने पूर्ण झाले आहेत. सकाळी शेतकऱ्यांकडून गाझीपूर सीमेवर राष्ट्रीय महामार्ग ९ रोखण्यात आला होता. संयुक्त किसान मोर्चाचे नेते दर्शन पाल यांनी सांगितलं की आंदोलक शेतकऱ्यांकडून दूध […]

