शपथविधीदरम्यान ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा दिल्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी समज दिली. उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना सांगितलं, व्यंकय्या नायडू यांचं वर्तन चुकीचं नाही. काँग्रेसच्या एका खासदाराने आक्षेप घेतला असता त्यांनी फक्त समज दिली. त्यांनी रेकॉर्डवर फक्त शपथ घेतली जाईल आणि हे राज्यघटनेला धरुन नाही इतकंच सांगितलं.
शिवाजी महाराजांच्या नावे राजकारण केलं जाऊ नये असं आवाहन केलं. जर महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता,” असं उदयनराजेंनी सांगितलं.




