Aamir Khan made a big decision not to use mobile

आमिर खानने घेतला मोठा निर्णय, आमिर आता नाही वापरणार मोबाईल

मनोरंजन

बॉलिवूड अभिनेता आमिर खानने आपल्या आगामी ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाच्या पूर्वी एक मोठा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत आमिर खानने मोबाईलचा वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आमिरने आपल्या पुढील चित्रपटासाठी ही वेगळीच पद्धत अवलंबली आहे. फोन सतत त्याच्या कामात अडथळे निर्माण करत आहे, असं आमीरचं म्हणणं आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटामध्ये त्याचा फोन अडथळा ठरू नये, म्हणून अभिनेत्याने हे पाऊल उचलले आहे.

आमिर खानचा हा चित्रपट देखील ख्रिसमसच्या दिवशी प्रदर्शित होईल. ‘लालसिंग चड्ढा’ मध्ये आमिर आणि करीना कपूर खान पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात मोना सिंग देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. मोनाने 3 इडियट्समध्ये आमिर-करीनाबरोबरही काम केले आहे. या चित्रपटामध्ये हे तिघे पुन्हा एकदा प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळतील.

आमिर खानचे ख्रिसमस रिलीज चित्रपट कायमच हिट ठरले आहेत. पीके, दंगल, धूम 3, तारे जमीन पर आणि गजनी. आमिर या सर्व चित्रपटांमध्ये त्याच्या 100% योगदानासाठी ओळखला जातो. आता आमिर खान ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करत आहे. अशा परिस्थितीत आवश्यक गोष्टींना महत्त्व देत आणि मोबाईल पासून दूर राहून आमिरने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की त्याला मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून का मानले जाते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत