अहिल्यानगर : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटात नागरिकांना तातडीची मदत उपलब्ध करून द्यावी. मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेल्या वस्त्यांतील नागरिकांना मदत करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीची माहिती पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी […]
टॅग: हवामान इशारा
सातारा जिल्ह्यातील वीर धरणातून २७ हजार ७९७ क्युसेक्स विसर्ग; सतर्कतेचा इशारा
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नागरीकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सातारा जिल्ह्यातील वीर धरणातून आज दिनांक २६ जून रोजी २७ हजार ७९७ क्युसेक्स विसर्ग नीरा नदी पात्रात सुरू आहे. नदी काठच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे. कोकण किनारपट्टीला आज २६ […]
खडकवासला धरणातून आता ४,३४५ क्युसेक्सने विसर्ग; पुण्यात हाय अलर्ट जारी
पुणे : खडकवासला धरण अधिकाऱ्यांनी आज सायंकाळी ६ वाजता मुठा नदीपात्रात ४,३४५ क्युसेक पाणी विसर्ग करण्याची घोषणा केली आहे. ही माहिती केंद्रीय नियंत्रण कक्षाच्या देखरेख अधिकारी श्वेता कुऱ्हाडे यांनी दिली. दुपारी सुरू झालेल्या २,००० क्युसेक विसर्गापेक्षा हा विसर्ग जास्त असून, पावसाच्या तीव्रतेनुसार पुढील तासांत त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. खबरदारीचे उपाय जारी वाढत्या पाण्याच्या […]
पेरण्यांची घाई नको; पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस
मुंबई : राज्यात पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषि विभागाने केले आहे. तर राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, शेतकरी, मच्छिमार बांधवांनी दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाऊस, पीक पाणी, […]
मान्सूनच्या प्रवासाची गती लवकरच कमी होणार असल्यामुळे राज्यात पावसात होणार घट
मुंबई : या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरु असल्यामुळे तो २५ मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे, जे सामान्य तारखेपेक्षा १० दिवस आधीच आहे. मात्र २७ मे पासून मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असल्यामुळे राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील. सध्याच्या अंदाजानुसार २७ मे पासून राज्यातील हवामान हळू हळू कोरडे होईल आणि काही […]
राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस प्रशासनाने सतर्क राहून मदत कार्य करावे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई : राज्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असून विशेषतः मुंबई कोकण पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कता ठेवून मदत कार्य करावे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये ठाणे, नाशिक जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे ठाणे, मुंबई महानगरपालिका आयुक्तांशी बोलून सूचना दिल्या. […]
राज्यात अवकाळी पाऊस! गारपीट आणि वादळाची शक्यता, हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी
पुणे : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मंगळवारी (१ एप्रिल) वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. भारतीय हवामान विभागाने (IMD) विविध प्रदेशांसाठी हवामानविषयक सूचना जारी केल्या आहेत, ज्यामध्ये येत्या काही दिवसांत पाऊस आणि वादळी वारे सुरू राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एप्रिलच्या सुरुवातीला पाऊस सुरू झाल्याने महाराष्ट्रात तापमानात थोडीशी घट झाली आहे. या अवकाळी पावसामुळे पिकांचे मात्र मोठे […]
पुण्यात उष्णतेचा कहर! पुण्यासह राज्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता, IMD कडून काळजी घेण्याचे आवाहन
पुणे : फेब्रुवारी महिन्याच्या उष्ण आणि कोरड्या हंगामानंतर, पुण्यात मार्च महिना नेहमीपेक्षा जास्त उष्ण राहणार आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने (IMD) दिली आहे. IMD ने आपल्या हंगामी अंदाजात म्हटले आहे की, मार्च महिना देशाच्या बहुतेक भागांसाठी नेहमीपेक्षा जास्त उष्ण राहणार आहे, आणि महाराष्ट्राच्या विविध भागांसाठीही उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. पुण्यात, जिथे ऐतिहासिकदृष्ट्या मार्चमध्ये तापमान […]








