भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने २२७ धावांनी विजय मिळवला. त्यानंतर रोहित शर्माच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. रोहितने दुसऱ्या कसोटीत शतक ठोकत त्याला दमदार उत्तर दिले. रोहितने आक्रमक पवित्रा घेत सातवं कसोटी शतक पूर्ण केलं. भारताने नाणेफेक जिंकल्यावर सलामीला शुबमन गिल आणि रोहित शर्मा आले. गिल शून्यावर माघारी परतला. पण रोहितने मात्र अर्धशतक लगावले. […]

