जिनिव्हा : भारतातील कोरोनाच्या गंभीर परिस्थितीवर ‘युनिसेफ’च्या प्रमुखांनी भाष्य केलं आहे. भारतातील कोरोनाचा कहर ही सगळ्यांसाठीच धोक्याची घंटा असून, जगाने आता पुढाकार घेऊन भारताला मदत केली नाही, तर याचे भारताबरोबरच जगावरही मोठे परिणाम होतील, असा इशारा ‘युनिसेफ’च्या प्रमुखांनी दिला आहे. भारतातील दुःखद परिस्थिती ही सर्वांसाठीच धोक्याची घंटा आहे,’ असे युनिसेफच्या कार्यकारी संचालक हेनरिटा फोर म्हणाल्या. […]

