टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत 317 धावांनी दणदणीत विजय मिळवला. दुसरी कसोटी जिंकत चार सामन्यांची मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी केली आहे. पण तिसर्या कसोटीत कर्णधार विराट कोहलीवर बंदी होऊ शकते. त्यामुळे विराट तिसऱ्या कसोटीत खेळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. कर्णधार विराट कोहलीने तिसर्या कसोटीच्या तिसर्या दिवशी पंच नितीन मेननच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला होता. […]

