रायगड : खालापूर तालु्क्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. रात्री १०.३० – ११ च्या सुमारास घडलेल्या या घटनेत गावातील जवळपास ५० घरं ढिगाऱ्याखाली गाडली गेली. दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरू असून आतापर्यंत ५ मृतदेह सापडले आहेत. ढिगाऱ्याखाली १०० पेक्षा अधिक जण अडकल्याची शक्यता आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. इर्शाळवाडी आदिवासीबहुल गाव असून […]

