मुंबई : मुंबईत विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून (17 जुलै) सुरू झाले. मात्र, विरोधकांनी कामकाज सुरू होताच थोड्या वेळाने सभात्याग केला. नंतर विरोधक कामकाज संपेपर्यंत सभागृहात परतले नाही. त्यानंतर पहिल्या दिवसाचे कामकाज अवघ्या काही तासांतच संपले. दरम्यान, अधिवेशन सुरू होण्याअगोदर विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘सासूमुळे वाटणी झाली आणि सासू वाट्याला आली’, ’50 खोके, […]

