राज्यातील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस अधिकच झपाट्याने वाढत असल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. आजही दिवसभरात राज्यात कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रविवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आज दिवसभरात राज्यात ३६ हजार ९०२ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. […]

