जालना : जालना शहरातील सोनलनगर भागात चारित्र्यावर संशय घेत मायलेकीचा खून केल्याची घटना सोमवारी सकाळी समोर आली आहे. पती, सवत व तिच्या मुलाने मारहाण करून भारती गणेश ऊर्फ संजू सातारे (३६) आणि वर्षा सातारे (१७) यांचा खून केला. मिळालेल्या माहितीनुसार, मृत भारती सातारे यांची बहीण पंचशीला कदम यांनी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. […]

