मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतून राज्य सावरल्यानंतर मास्कची सक्ती काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, देशातील काही राज्यांमध्ये पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने राज्यात पुन्हा मास्कसक्ती करण्यात यावी, असा प्रस्ताव राज्य टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांकडे दिल्याची माहिती मिळाली आहे. येत्या जून महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाची लाट येण्याची शक्यताही वर्तविण्यात आली असून लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज व्यक्त […]

