मुंबई : वाहनांच्या पार्किंगची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली असून राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. भविष्याचा विचार करता लवकरच राज्यासाठी ‘एकात्मिक पार्किंग धोरण’ आणण्याचा विचार परिवहन विभाग करत आहे. या धोरणाची प्राथमिक अंमलबजावणी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये (MMRDA) करण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. […]
टॅग: महाराष्ट्र बातम्या
पुण्यात स्पा सेंटरच्या आड सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोघांना अटक
पुणे : कल्याणी नगरमधील स्पा सेंटरच्या आड चालणाऱ्या मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून कथित सूत्रधार सध्या फरार आहे. येरवडा पोलिस स्टेशन आणि पुणे गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या संयुक्त कारवाईत हा प्रकार समोर आला. मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई शुक्रवारी १६ मे रोजी कल्याणी नगर येथील […]
अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना, मालगाडीचे सात डब्बे रुळावरून घसरले
जळगाव : आज दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना घडली आहे. भुसावळहून नंदूरबारकडे निघालेली मालगाडी या स्थानकाजवळील रेल्वे रुळावरून खाली घसरली. या दुर्घटनेत मालगाडीचे सात डब्बे रेल्वे रुळावरून घसरले आणि अस्ताव्यस्त झाले आहेत. दुर्घटना अमळनेर स्थानकापासून अगदी जवळच, प्रसिद्ध प्रताप महाविद्यालयाच्या बाजूला घडली. या दुर्घटनेत लोको पायलट आणि गार्ड […]
पीकविमा योजना ते इलेक्ट्रिक वाहन धोरण, मंत्रिमंडळ बैठकीत ‘हे’ ११ मोठे निर्णय
मुंबई : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे संपन्न झाली. या बैठकीत राज्यातील विविध विभागांनी आगामी काळात राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय महत्वाचे निर्णय घेतले आहेत. जलसंपदा, महिला व बाल विकास, सार्वजनिक बांधकाम, कृषी, परिवहन आणि समाजकल्याण विभागांचे हे निर्णय भविष्यातील धोरणात्मक दिशादर्शक ठरतील. मंत्रिमंडळ बैठकीतील ११ प्रमुख निर्णय 1. टेमघर […]
सोलापुरात आणखी एका डॉक्टरची आत्महत्या, बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह
सोलापूर : सोलापुरात एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केलेल्या एका डॉक्टराने स्वतःचा गळा कापून आत्महत्या केली आहे. आदित्य नांबीयार असे आत्महत्या केलेल्या शिकाऊ डॉक्टरचे नाव आहे. तो सध्या सोलापुरात राहत होता, तर मूळचा मुंबईचा असल्याची माहिती मिळाली आहे. आदित्यने अलीकडेच एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले होते.अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. आदित्यने सोलापूर शहरातील डॉ व्ही एम वैशंपायन […]
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा समावेश आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर सदर कुटुंबांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून पीडित कुटुंबांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय आज झालेल्या […]
सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : निरोगी नागरिक हाच राज्याच्या प्रगतीचा पाया असून, आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासोबतच सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध असून याकरीता सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. कुटुंब कल्याण भवन येथे आयोजित राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत भूमिपूजन आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना […]
खंडाळ्याजवळ झालेल्या भीषण अपघातात तीन ठार, अनेक जण जखमी
पुणे : खंडाळा जवळील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर रविवारी (२० एप्रिल) रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (क्रमांक – GJ 03 BT 6701) मागून इनोव्हा कारला (MH 19 BG 8067) जोरदार धडक दिल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची तीव्रता इतकी होती की […]
एसटी कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या ७ तारखेला मिळेल पगार, प्रताप सरनाईक यांनी केल्या ‘या’ महत्त्वाच्या घोषणा
मुंबई : एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या ७ तारखेला वेतन मिळेल, याचे स्पष्ट आणि ठोस आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, “आर्थिक अडचणी असूनही, कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार नाही याची जबाबदारी माझी असेल.” एसटी मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात सरनाईक यांनी पदभार स्वीकारला. यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. […]
पुणे : ८ वर्षीय मुलाचे अपहरण, पोलिसांनी २ तासांत ट्रेनमधून केली मुलाची सुटका
पुणे : अपहरण झालेल्या आठ वर्षांच्या मुलाला पिंपरी चिंचवड पोलिसांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) मदतीने दोन तासांत वाचवले. विशेष म्हणजे, कुटुंबातील ओळखीच्या व्यक्तीनेच या मुलाचे अपहरण केले होते. याप्रकरणी, महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथील गजानन पानपाटील (२५) या कथित अपहरणकर्त्याला पोलिसांनी अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी चिंचवड पोलिस ठाण्यात एका महिलेने तक्रार दाखल केली की […]









