पंजाब : पंजाबमधील जालंधर शहरात एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरातील बाथरूममध्ये बसवलेल्या गिझरमधून गॅस गळती झाल्याने आंघोळ करत असताना एका २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. मुनमुन चितवन असे मृत तरुणीचे नाव असून, ती शिवसेनेचे पंजाबमधील नेते दीपक कंबोज यांची कन्या होती. ही घटना नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडली. विशेष बाब म्हणजे […]
Sample Page
याला जीवन ऐसे नाव! स्वतःला नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढा, जीवन भरभरून जगण्यासाठी ‘या’ गोष्टी करा…
आयुष्य… कधी हसवणारं, कधी रडवणारं, तर कधी पूर्णपणे थांबलेलं वाटणारं. काही दिवस असे येतात की, सकाळ उजाडली तरी मनात अंधार दाटलेला असतो. कुणाशी बोलावंसं वाटत नाही, काही करावंसं वाटत नाही… आणि हळूहळू माणूस स्वतःच्याच विचारांच्या गर्तेत अडकत जातो. यालाच आपण नैराश्य म्हणतो. पण लक्षात ठेवा — नैराश्य ही अवस्था आहे. नैराश्य म्हणजे आयुष्याचा शेवट नाही, […]
पैशांच्या लालसेतून नाशिकमध्ये तरुणाची निर्घृण हत्या, थर्टी फर्स्ट पार्टीच्या बहाण्याने बोलावलं अन्…
नाशिक : नववर्ष स्वागताच्या पार्टीसाठी पैशांची गरज आणि महागड्या मोबाईलची लालसा एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यात उघडकीस आली आहे. सिन्नर तालुक्यातील पास्ते घाट परिसरात आढळलेल्या खून प्रकरणाचा छडा लावत सिन्नर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत अल्पवयीन आरोपीसह दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. ही घटना मंगळवार, 30 डिसेंबर रोजी उघडकीस आली. पास्ते घाटात रस्त्याच्या कडेला […]
केंद्रीय मंत्रिमंडळाची महाराष्ट्रातील नाशिक-सोलापूर-अक्कलकोट या सहा पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉरला मंजुरी
नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज महाराष्ट्रात 374 कि.मी. लांबीच्या सहा पदरी ग्रीनफिल्ड ॲक्सेस-कंट्रोल्ड नाशिक-सोलापूर- अक्कलकोट मार्गिकेच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्त्वावर राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचा एकूण भांडवली खर्च 19,142 कोटी रुपये आहे. नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर या महत्त्वाच्या शहरांसह पुढे […]
राज्यभर १ ते ३१ जानेवारी दरम्यान ‘रस्ता सुरक्षा अभियान’
मुंबई : रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्यभर 1 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना हे अभियान साजरे करण्यात येणार आहे. यानिमित्ताने संपूर्ण राज्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत परिवहन विभाग, वाहतूक पोलीस […]
दिव्यांगांच्या विशेष शाळांतील अतिरिक्त शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी सर्वसमावेशक कार्यपद्धती
मुंबई : राज्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा व कार्यशाळांमधील नोंदणी प्रमाणपत्र रद्द होणे, नूतनीकरण न करणे तसेच पटनिर्धारणानंतर विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी सर्वसमावेशक व एकसंध कार्यपद्धती निश्चित केली आहे, अशी माहिती दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दिली. सचिव मुंढे म्हणाले, यापूर्वी विविध शासन निर्णय, परिपत्रके व शाळा […]
जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री नितेश राणे
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून काजू आणि इतर कृषी उत्पादनांच्या निर्यातीची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. याविषयी मंत्रालयात आयोजित बैठकीवेळी ते बोलत होते. बैठकीस महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, मित्राचे सल्लागार परशराम पाटील यांच्यासह जेएसडब्ल्यू ग्रुपचे प्रतिनिधी उपस्थित […]
मुंबईत इलेक्ट्रिक बसच्या धडकेत ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
मुंबई : भांडुप (पश्चिम) रेल्वे स्थानकाबाहेर सोमवारी रात्री उशिरा घडलेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून किमान १० जण जखमी झाले आहेत. २९ डिसेंबर रोजी रात्री सुमारे १०.०५ वाजता ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे मुंबईतील गर्दीच्या उपनगरीय स्थानक परिसरातील रस्ते सुरक्षा आणि पादचाऱ्यांसाठी अपुऱ्या जागेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हा अपघात मार्ग A-606 […]
चंद्रपूरच्या ताडोबा बफर झोनमध्ये वाघाच्या हल्ल्यात दोन कामगारांचा मृत्यू
चंद्रपूर : महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (TATR) बफर झोनमध्ये वाघांच्या हल्ल्यात दोन बांबू तोडणाऱ्या मजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातील शैसावी गावाचे रहिवासी बुधसिंग श्यामलाल मडावी (वय ४१) यांचा चंद्रपूर वन परिक्षेत्रातील कंपार्टमेंट क्रमांक ३८१ मध्ये वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. […]
अंघोळ किती वेळ करावी? वैज्ञानिक कारणांसह जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी…
पुणे : दैनंदिन जीवनात अंघोळ ही स्वच्छतेसाठी आवश्यक सवय आहे. मात्र, अंघोळ किती वेळ करावी याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. काही जण दीर्घकाळ अंघोळ करतात, तर काही फारच कमी वेळात आंघोळ उरकतात. वैद्यकीय व त्वचारोगतज्ज्ञांच्या मते, अंघोळीचा आदर्श कालावधी 5 ते 10 मिनिटे असावा. वैज्ञानिक कारणे काय सांगतात? त्वचेतील नैसर्गिक तेलांचे संरक्षण त्वचेवर ‘सीबम’ नावाचे नैसर्गिक […]










