मुंबई : राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढत जाणार आहे. आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेज अलर्ट जारी करण्यात आला असून तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई शहर आणि उपनगरात रिमझिम पाऊस सुरु आहे. तसेच, राज्यात अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उद्या (6 सप्टेंबर) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांना ऑरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 7 सप्टेंबरसाठी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर 8 सप्टेंबरसाठी पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मच्छिमारांना सावध राहण्याचा इशारा दिला असून खोल समुद्रात बोटी घेऊन न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
कमी दाबाचे क्षेत्र,येत्या ४८ तासात उत्तर/उत्तर मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण होण्याची शक्यता. त्या मुळे येत्या 4,5 दिवसात राज्यात बऱ्याच ठिकाणी विजांच्या गडगडाटासहित मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आज IMD ने वर्तवली आहे.
४,५ दिवशी कोकणात जास्त प्रभाव,मुंबई ठाणे पालघर. TC pic.twitter.com/eKoxbVul0r— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 4, 2021




