भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने महाराष्ट्रातील सांगली येथील सर्जेरोदादा नाईक शिराळा सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची शक्यता नसल्यामुळे आरबीआयने हे पाऊल उचलले आहे.
आरबीआयने एका निवेदनात म्हटले आहे कि, “परवाना रद्द केल्यामुळे, बुधवारी कामकाजाचा दिवस संपल्यानंतर सर्जेरोदादा नाईक शिराळा सहकारी बँक लिमिटेडचा बँकिंग व्यवसाय निलंबित करण्यात आला आहे.” निवेदनानुसार सहकारिता आयुक्त आणि सहकारी संस्थांच्या निबंधकांना देखील बँक बंद करण्याचे आदेश जारी करून कर्जदारासाठी लिक्विडेटर नेमण्याची विनंती करण्यात आली आहे.
RBI ने म्हटले आहे की लिक्विडेशनवर प्रत्येक ठेवीदाराला ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून पाच लाख रुपयांच्या आर्थिक मर्यादेपर्यंत ठेव विमा दाव्याची रक्कम मिळण्याचा अधिकार असेल. याचा अर्थ खातेदारांना विम्याची रक्कम म्हणून कमाल 5 लाख रुपये मिळतील.




